Wednesday, January 15, 2025
Homeटॉप स्टोरीचौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात...

चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात अंदाजे ६० टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या ११ मतदारसंघात काल सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. अंतीम टक्केवारीत आणखी तीन ते चार टक्के मतांची भर पडण्याची शक्यता आहे.

नंदुरबारमध्ये ६७.१२, जळगावात ५३.६५, रावेरमध्ये ६१.३६, जालन्यात ६८.३०, औरंगाबादमध्ये ६०.७३, मावळमध्ये ५२.९०, पुण्यात ५१.२५, शिरूरमध्ये ५१.४६, अहमदनगरमध्ये ६२.७६, शिर्डीत ६१.१३ तर बीडमध्ये ६९.७४ टक्के मतदान झाले.

सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान

चौथ्या टप्प्यात काल सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु झाले. सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ८.४३, जळगावमध्ये ६.१४, रावेरमध्ये ७.१४, जालन्यात ६.८८, औरंगाबादमध्ये ७.५२, मावळमध्ये ५.३८, पुण्यात ६.६१, शिरूरमध्ये ४.९७, अहमदनगरमध्ये ५.१३, शिर्डीत ६.८३ तर बीडमध्ये ६.७२ टक्के मतदान झाले.

सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान

११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये २२.१२, जळगावमध्ये १६.८९, रावेरमध्ये १९.०३, जालनामध्ये २१.३५, औरंगाबादमध्ये १९.५३, मावळमध्ये १४.८७, पुण्यात १६.१६, शिरूरमध्ये १४.५१, अहमदनगरमध्ये १४.७४, शिर्डीत १८.९१ तर बीडमध्ये १६.६२ टक्के मतदान झाले.

मतदान

दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान

दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ३७.३३, जळगावमध्ये ३१.७०, रावेरमध्ये ३२.०२, जालन्यात ३४.४२, औरंगाबादमध्ये ३२.३७, मावळमध्ये २७.१४, पुण्यात २६.४८, शिरूरमध्ये २६.६२, अहमदनगरमध्ये २९.४५, शिर्डीत ३०.४९ तर बीडमध्ये ३३.६५ टक्के मतदान झाले.

दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.३५ टक्के मतदान

दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ४९.९१, जळगावमध्ये ४२.१५, रावेरमध्ये ४५.२६, जालनामध्ये ४७.५१, औरंगाबादमध्ये ४३.७६, मावळमध्ये ३६.५४, पुण्यात ३५.६१, शिरूरमध्ये ३६.४३, अहमदनगरमध्ये ४१.३५, शिर्डीत ४४.८७ तर बीडमध्ये ४६.४९ टक्के मतदान झाले.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२.४९ टक्के मतदान

सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ६०.६०, जळगावात ५१.९८, रावेरमध्ये ५५.३६, जालन्यात ५८.८५, औरंगाबादमध्ये ५४.०२, मावळमध्ये ४६.०३, पुण्यात ४४.९०, शिरूरमध्ये ४३.८९, अहमदनगरमध्ये ५३.२७, शिर्डीत ५२.२७ तर बीडमध्ये ५८.२१ टक्के मतदान झाले.

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content