Homeटॉप स्टोरीचौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात...

चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात अंदाजे ६० टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या ११ मतदारसंघात काल सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. अंतीम टक्केवारीत आणखी तीन ते चार टक्के मतांची भर पडण्याची शक्यता आहे.

नंदुरबारमध्ये ६७.१२, जळगावात ५३.६५, रावेरमध्ये ६१.३६, जालन्यात ६८.३०, औरंगाबादमध्ये ६०.७३, मावळमध्ये ५२.९०, पुण्यात ५१.२५, शिरूरमध्ये ५१.४६, अहमदनगरमध्ये ६२.७६, शिर्डीत ६१.१३ तर बीडमध्ये ६९.७४ टक्के मतदान झाले.

सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान

चौथ्या टप्प्यात काल सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु झाले. सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ८.४३, जळगावमध्ये ६.१४, रावेरमध्ये ७.१४, जालन्यात ६.८८, औरंगाबादमध्ये ७.५२, मावळमध्ये ५.३८, पुण्यात ६.६१, शिरूरमध्ये ४.९७, अहमदनगरमध्ये ५.१३, शिर्डीत ६.८३ तर बीडमध्ये ६.७२ टक्के मतदान झाले.

सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान

११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये २२.१२, जळगावमध्ये १६.८९, रावेरमध्ये १९.०३, जालनामध्ये २१.३५, औरंगाबादमध्ये १९.५३, मावळमध्ये १४.८७, पुण्यात १६.१६, शिरूरमध्ये १४.५१, अहमदनगरमध्ये १४.७४, शिर्डीत १८.९१ तर बीडमध्ये १६.६२ टक्के मतदान झाले.

मतदान

दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान

दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ३७.३३, जळगावमध्ये ३१.७०, रावेरमध्ये ३२.०२, जालन्यात ३४.४२, औरंगाबादमध्ये ३२.३७, मावळमध्ये २७.१४, पुण्यात २६.४८, शिरूरमध्ये २६.६२, अहमदनगरमध्ये २९.४५, शिर्डीत ३०.४९ तर बीडमध्ये ३३.६५ टक्के मतदान झाले.

दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.३५ टक्के मतदान

दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ४९.९१, जळगावमध्ये ४२.१५, रावेरमध्ये ४५.२६, जालनामध्ये ४७.५१, औरंगाबादमध्ये ४३.७६, मावळमध्ये ३६.५४, पुण्यात ३५.६१, शिरूरमध्ये ३६.४३, अहमदनगरमध्ये ४१.३५, शिर्डीत ४४.८७ तर बीडमध्ये ४६.४९ टक्के मतदान झाले.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२.४९ टक्के मतदान

सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ६०.६०, जळगावात ५१.९८, रावेरमध्ये ५५.३६, जालन्यात ५८.८५, औरंगाबादमध्ये ५४.०२, मावळमध्ये ४६.०३, पुण्यात ४४.९०, शिरूरमध्ये ४३.८९, अहमदनगरमध्ये ५३.२७, शिर्डीत ५२.२७ तर बीडमध्ये ५८.२१ टक्के मतदान झाले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी सीरियाच्या दमास्कस दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीकरीता निघाल्यानंतर ते उतरलेल्या हॉटेलच्या जवळ दोन बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट मॅक्रॉन यांच्यावरील अयशस्वी हल्ला असल्याचे मानले जात आहे. असद राजवट पडल्यानंतर सीरियाला भेट देणारे...

वाहू लागला मुंबईकरांची तहान भागवणारा पहिला तलाव!

मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि मुंबईतच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक पालिकेचा ‘विहार’ तलाव आज, ७ जुलैला रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे‌. हा तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्टला पूर्ण भरुन वाहू लागला होता. सन १८५९मध्ये...
Skip to content