Homeकल्चर +'अमायरा'ला प्रेक्षकांचा उदंड...

‘अमायरा’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अमायरा’ हा मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनाला भिडला असून त्याला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. २३ मे २०२५ला हा सिनेमा रिलीझ झाला. उत्कृष्ट अभिनय आणि दर्जेदार कहाणी यामुळे या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगली घोडदौड केली आहे. चित्रपटातील मुख्य भूमिका साकारलेल्या अजिंक्य देव, राजेश्वरी सचदेव, पूजा सावंत, सई गोडबोले यांच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. खासकरून सर्वात यंग अभिनेत्री म्हणजेच सई गोडबोलेला प्रेक्षक भरपूर प्रतिसाद देत आहेत.

काही सिनेप्रेमी प्रतिक्रिया देत म्हणाले की, ही फक्त कथा नसून, ती एक भावना आहे. सिनेमा पाहून मनापासून समाधान वाटलं. या चित्रपटाचे यश मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक सकारात्मक पाऊल आहे, असं एकाचं म्हणणं होतं. या चित्रपटात नव्या चेहऱ्याने साकारलेली मुख्य भूमिका तितकीच ताकदवान आहे. सईच्या नैसर्गिक अभिनयाने भारावून टाकले आहे. संगीतसुद्धा चित्रपटाचे वैशिष्ट्य असून प्रत्येक गाणं कथानकात सहज मिसळत जाते. विशेष म्हणजे, चित्रपटात एक अप्रतिक्षित वळण येतं जे आश्चर्यचकित करतं, असं मत एकाने व्यक्त केलं. संगीत, छायाचित्रण आणि पार्श्वसंगीत यांनाही विशेष दाद मिळत आहे. सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकांनी चित्रपटाचे अनेक भावस्पर्शी प्रसंग शेअर करत चित्रपटाविषयी आपले प्रेम व्यक्त केले आहे.

“अमायरा” हा चित्रपट प्रेम, संघर्ष आणि आत्मभानाच्या प्रवासाची कथा सांगतो. आजच्या तरुणाईला भावणारा असा हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे. ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंटच्या अंतर्गत हा सिनेमा बनला आहे. या सिनेमाचे लेखक मिहीर राजदा आहेत. तसेच राहुल पुरी, स्वाती खोपकर, सुरेश पै निर्माते आहेत. निनाद बत्तीन आणि तबरेज पटेल सहनिर्माते आहेत.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content