Homeबॅक पेजचेंबूर जिमखाना कॅरमः...

चेंबूर जिमखाना कॅरमः आकांक्षा, घुफ्रानची बाजी

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित केलेल्या व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतल्या महिला एकेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने बाजी मारली. अंतिम सामन्यात तिने प्रतिस्पर्धी मुंबईच्या रिंकी कुमारीला सहज नमवून विजेतेपद पटकाविले. तर, पुरुषांच्या अंतिम सामन्यात अनुभवाच्या जोरावर मुंबईच्या महम्मद घुफ्रानने मुंबईच्याच विकास धारियावर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीमध्ये पहिला सेट ११-२५ हरल्यानंतरदेखील पुढील दोन सेट २५-११ व २५-१५ असे जिंकून आपल्या विजयावर शिक्कमोर्तब केले.

अंतिम सामन्यापूर्वी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे मुंबई क्लस्टर १चे प्रमुख गुंजन सिंग यांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करण्यात आली. पुरुषांच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी विकास धारियाने मुंबईच्या अमोल सावर्डेकरवर सहज मात केली. घुफ्रानने मुंबईच्या माजी विश्व्विजेत्या प्रशांत मोरेला कडव्या लढतीनंतर नमवले होते. महिलांमध्ये विजेत्या आकांक्षाने उपांत्य लढतीत मुंबईच्या नीलम घोडकेला तीन सेटमध्ये  हरविले. रिंकीने अंतिम फेरी गाठण्यापूर्वी अनुभवी राष्ट्रीय विजेत्या संगीता चांदोरकरला सहज नमवले.

विजेत्या खेळाडूंना चेंबूर जिमखान्याचे अध्यक्ष बाळकृष्ण वाधवान, सल्लागार सुरिंदर शर्मा, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक चेंबूरचे शाखाधिकारी मंदार चाचड, ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग मॅनेजर मोहित नारंग यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन कॅरम व बुद्धिबळ विभागाचे सचिव बाळकृष्ण परब यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहचिटणीस केतन चिखले, मुंबई उपनगर जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण उपस्थित होते.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content