Homeबॅक पेजचेंबूर जिमखाना कॅरमः...

चेंबूर जिमखाना कॅरमः आकांक्षा, घुफ्रानची बाजी

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित केलेल्या व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतल्या महिला एकेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने बाजी मारली. अंतिम सामन्यात तिने प्रतिस्पर्धी मुंबईच्या रिंकी कुमारीला सहज नमवून विजेतेपद पटकाविले. तर, पुरुषांच्या अंतिम सामन्यात अनुभवाच्या जोरावर मुंबईच्या महम्मद घुफ्रानने मुंबईच्याच विकास धारियावर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीमध्ये पहिला सेट ११-२५ हरल्यानंतरदेखील पुढील दोन सेट २५-११ व २५-१५ असे जिंकून आपल्या विजयावर शिक्कमोर्तब केले.

अंतिम सामन्यापूर्वी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे मुंबई क्लस्टर १चे प्रमुख गुंजन सिंग यांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करण्यात आली. पुरुषांच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी विकास धारियाने मुंबईच्या अमोल सावर्डेकरवर सहज मात केली. घुफ्रानने मुंबईच्या माजी विश्व्विजेत्या प्रशांत मोरेला कडव्या लढतीनंतर नमवले होते. महिलांमध्ये विजेत्या आकांक्षाने उपांत्य लढतीत मुंबईच्या नीलम घोडकेला तीन सेटमध्ये  हरविले. रिंकीने अंतिम फेरी गाठण्यापूर्वी अनुभवी राष्ट्रीय विजेत्या संगीता चांदोरकरला सहज नमवले.

विजेत्या खेळाडूंना चेंबूर जिमखान्याचे अध्यक्ष बाळकृष्ण वाधवान, सल्लागार सुरिंदर शर्मा, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक चेंबूरचे शाखाधिकारी मंदार चाचड, ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग मॅनेजर मोहित नारंग यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन कॅरम व बुद्धिबळ विभागाचे सचिव बाळकृष्ण परब यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहचिटणीस केतन चिखले, मुंबई उपनगर जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण उपस्थित होते.

Continue reading

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...

पेट्रोल-डिझेलची दरवाढ अटळ?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे भारतातील सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांच्या तोट्यात मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या कंपन्यांना सध्या दरमहा सुमारे ३०,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे....
Skip to content