Homeचिट चॅटबार कौन्सिल ऑफ...

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोव्याच्या अध्यक्षपदी अहमदखान पठाण

अॅड. अहमदखान पठाण यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. बार कॉन्सिलच्या मुंबईत झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते अॅड. पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अॅड. पठाण हे बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, या वकिलाच्या शिखर परिषदेवर सलग तीन वेळा निवडून आले आहेत. यापूर्वी तीन वेळा त्यांनी बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवाचे उपाध्यक्षपद भूषविलेले आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सदस्यपदीही ते तीन वेळा निवडून आले आहेत. ते वक्फ मंडळाचे विद्यमान सदस्यही आहेत.

त्यांच्या अध्यक्षपदावरील निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पदाला न्याय देऊन वकिलांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी प्रतिक्रिया पठाण यांनी त्यांच्या निवडीनंतर व्यक्त केली आहे. विधि क्षेत्रातील एक नामवंत शिक्षक म्हणून त्यांचा विशेष लौकिक आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी विधि क्षेत्रात वकील आणि न्यायाधीशपदावर कार्यरत आहेत. अॅड. पठाण पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यातील बादशहा तलाव येथील आहेत. कुटुंबातील पहिले वकील असलेल्या पठाण यांनी स्वःकर्तृत्वाने हे यश संपादन करून नवीन पिढीसाठी आदर्श निर्माण केला आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content