Homeकल्चर +'अभिजात साहित्याचे अक्षरविश्व' प्रकाशित

‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व’ प्रकाशित

सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे लिखित आणि ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित ‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व’, या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विजय कुवळेकर, संजीवनी खेर आणि दिनकर गांगल यांच्या हस्ते मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नुकतेच झाले.

या पुस्तकात १५३२ ते २००१ या कालावधील जगभरातील साहित्यकृतींचा आढावा घेण्यात आला आहे. संजीवनी खेर यांनी पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित केले तर विजय कुवळेकर यांनी पुस्तकाचे सखोल विश्लेषण केले. जागतिक साहित्यातील अभिजात साहित्याच्या शाश्वत वारशावर भर देत, त्यांच्या लेखकांच्या अनुभवांच्या समृद्धतेने या कलाकृतींना मोठ्या उंचीवर नेले आहे असे त्यांनी सांगितले. पूर्वी समाजात परिवर्तनाचे मोलाचे कार्य साहित्यकृतींनी केले आहे. त्यामुळे या साहित्यकृती आपण या पुस्तकातून समजून घेतल्या पाहिजेत, असे विचार दिनकर गांगल यांनी व्यक्त केले. अजरामर आणि अभिजात साहित्यिककृती उपयुक्त असून तिच्यातील समाजबदलाचे संदर्भ आजही आपल्याला अभ्यासता येतात. त्यामुळे अशा साहित्यकृतींना एकत्रित ठेवण्याची किमया साध्य करणारे हे पुस्तक निश्चितच पुढच्या पिढीसाठीही महत्त्वाचे आहे, असे कुमार केतकर म्हणाले.

वाचनाचा छंद आणि साहित्याची आवड यातून जगभरातील पुस्तकांच्या संपर्कात आलो. वाचन वाढत गेले आणि त्यातूनच मग जगभरातील मान्यवरांच्या पुस्तकांचा आढावा घेणारा हा ग्रंथ निर्माण करता आला, असे विचार लेखक राजीव श्रीखंडे यांनी मांडले. सुदेश हिंगलासपूरकर यांनी प्रास्ताविकात ग्रंथालीविषयी आणि सध्याच्या उपक्रमांविषयीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरुंधती भालेराव यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवर साहित्यिक रसिकांची एक सुरेख मैफल जमली होती.

Continue reading

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...

साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-साईनगर शिर्डी रेल्वे उद्यापासून!!

पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वेसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्या दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी डेली एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. पुणे आणि साईनगर, शिर्डीदरम्यानची ही पहिलीच थेट रेल्वेसेवा असेल, ज्यामुळे...
Skip to content