Homeकल्चर +अनुराधा पौडवाल यांची...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली.

श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर, अनुराधा पौडवाल यांच्या कन्या कविता पौडवाल, या ध्वनिचित्रफितीचे निर्माते लंडनस्थित व्यावसायिक दिलीप आपटे यावेळी उपस्थित होते. अत्यंत मांगल्यपूर्ण वातावरणात या पारंपरिक, सुश्राव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण भक्ती रचनेच्या ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण सिध्दीविनायकाच्या साक्षीने झाले.

गणेश पंचरत्न हे श्री गणेशाची स्तुती करणारे एक उत्तम श्लोककाव्य आहे. काही महिन्यांपूर्वी सुप्रसिध्द गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी आदि शंकराचार्यरचीत विघ्नहर्त्याचे हे पंचरत्न स्तुती काव्य लंडन येथील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये गायले. ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून ते सर्वसामान्य भाविकांना आता ऐकता येणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात संगीत रसिक आणि श्री गणेशभक्तांना अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात पंचरत्न श्लोककाव्य ऐकण्याचा भाग्य योग लाभणार आहे. मंगळवारी श्री सिध्दीविनायक मंदिराच्या प्रांगणात ‘गणेश पंचरत्न’ श्लोककाव्य प्रसारित करण्यात आले. त्यामुळे तेथील प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात भर पडली. मंदिरात दर्शनासाठी येणारे हजारो भाविक तल्लीनतेने हे श्लोककाव्य ऐकत होते. 

Continue reading

जि.प. निवडणुकीत आंबेडकर, जानकरांपाठोपाठ शेंडगेही काँग्रेसबरोबर

महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी तसेच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर आघाडी करणाऱ्या काँग्रेसने आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्त्वाखालील ओबीसी बहुजन आघाडीलाही बरोबर घेतले आहे. ही...

भाजपात निष्ठावंतांकडून उचल खाण्यास सुरूवात!

गेल्या काही वर्षांपासून पक्षवाढीच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीत (भाजपा) विविध पक्षांमधून होणाऱ्या इनकमिंगमुळे मूळच्या भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाला आता वाचा फुटू लागली आहे. पक्षवाढ करताना वेगवेगळ्या पक्षांमधून कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेलेच पाहिजेत. पण त्यामुळे वर्षानुवर्षे संधीच्या आशेवर कार्यरत...

महाराष्ट्रात थंडीची लाट हळूहळू ओसरणार!

या हंगामात हवामानाचा लहरीपणा सुरूच असून देशभरासह राज्याच्या काही भागात आता नव्याने थंडीचे पुनरागमन होत आहे. राज्यात सध्या हवामानाचे संमिश्र स्वरूप अनुभवायला मिळत आहे. पहाटे आणि रात्री जाणवणारा गारवा आणि दिवसा सूर्यप्रकाशामुळे जाणवणारा उकाडा, अशा दुहेरी वातावरणाने नागरिक काहीसे...
Skip to content