Homeचिट चॅटश्री गणेश आखाड्यात...

श्री गणेश आखाड्यात मान्यवरांचा गौरव

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्यावतीने मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक तसेच विविध स्पर्धांत पदक पटकावलेल्या आखाड्याच्या कुस्तीगिरांचा गौरव सोहळा उत्साही वातावरणात नुकताच संपन्न झाला. सर्वांना फेटे बांधून, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यावेळी गौरवण्यात आले. महापौर डिंपल मेहता यांचा सत्कार सुनंदा माने आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांचा सत्कार मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, मिलिंद लिमये यांनी केला. नगरसेवक भगवती शर्मा, सुरेश खंडेलवाल, सचिन डोंगरे, दीपक सावंत, नगरसेविका आकांक्षा वीरकर, किमया रकवी, आभा पाटील यांनादेखील यावेळी सन्मानित करण्यात आले.

यावेळी आखाड्याचे विविध‌ स्पर्धांत चमकलेले कुस्तीपटू विशाल जाधव, कोमल पटेल, मनीषा शेलार, गणेश शिंदे, सूरज माने, प्रवेश यादव, अनिकेत यादव, डॉली गुप्ता, आदर्श शिंदे, ओम जाधव, समीर बोबडे, स्नेहा मल्ला, देवेंद्र या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद लिमये यांनी केले. महापौर डिंपल मेहता व उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी आपल्या मनोगतात आखाड्याच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत कुस्तीगिरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या समारंभाचे सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक बलराज बागल यांनी केले.

Continue reading

आता सोने-चांदी-प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीला लागणार परवाना!

मुक्त व्यापार करारांचा (एफटीए) गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीवर मोठे निर्बंध लादले आहेत. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, या दागिन्यांची आयात आता ‘फ्री’ ऐवजी ‘रिस्ट्रिक्टेड’ श्रेणीत टाकण्यात आली असून, आयातीसाठी पूर्वपरवानगी...

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....
Skip to content