Homeचिट चॅटश्री गणेश आखाड्यात...

श्री गणेश आखाड्यात मान्यवरांचा गौरव

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्यावतीने मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक तसेच विविध स्पर्धांत पदक पटकावलेल्या आखाड्याच्या कुस्तीगिरांचा गौरव सोहळा उत्साही वातावरणात नुकताच संपन्न झाला. सर्वांना फेटे बांधून, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यावेळी गौरवण्यात आले. महापौर डिंपल मेहता यांचा सत्कार सुनंदा माने आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांचा सत्कार मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, मिलिंद लिमये यांनी केला. नगरसेवक भगवती शर्मा, सुरेश खंडेलवाल, सचिन डोंगरे, दीपक सावंत, नगरसेविका आकांक्षा वीरकर, किमया रकवी, आभा पाटील यांनादेखील यावेळी सन्मानित करण्यात आले.

यावेळी आखाड्याचे विविध‌ स्पर्धांत चमकलेले कुस्तीपटू विशाल जाधव, कोमल पटेल, मनीषा शेलार, गणेश शिंदे, सूरज माने, प्रवेश यादव, अनिकेत यादव, डॉली गुप्ता, आदर्श शिंदे, ओम जाधव, समीर बोबडे, स्नेहा मल्ला, देवेंद्र या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद लिमये यांनी केले. महापौर डिंपल मेहता व उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी आपल्या मनोगतात आखाड्याच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत कुस्तीगिरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या समारंभाचे सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक बलराज बागल यांनी केले.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content