Homeपब्लिक फिगरआटपाडी नगरपंचायत होणार...

आटपाडी नगरपंचायत होणार नगर परिषद!

नगरपरिषद आणि नगरपंचायत यांना विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देतानाच सांगली जिल्ह्यातील आटपाडी नगरपंचायतऐवजी नगर परिषद करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाला प्रस्ताव पाठवण्याची सूचनाही त्यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदांमधील  विकासकामांचा आढावा घेण्यासाठी नगरविकास मंत्री सांगली दौऱ्यावर होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्ह्यातील आमदार अनिल बाबर, सुमन पाटील यावेळी उपस्थित होते.

एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे होणारे बदल लोकप्रतिनिधी व प्रशासनाला लक्षात आणून देण्यासाठी विशेष सादरीकरण यावेळी करण्यात आले. बदललेल्या विकास नियंत्रण नियमावलीचे फायदे लोकांना मिळणार असून हे निर्णय लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागवार कार्यशाळा घेण्यात येईल, असे शिंदे म्हणाले.

जयंत पाटील यांनी आष्टा आणि ईस्लामपूर याबाबत पत्र लिहून केलेल्या सूचना नक्की पूर्ण करू असही त्यांनी स्पष्ट केले. विटा, तासगाव येतील पाणी पुरवठा पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक यांनी केल्या. त्यासोबतच पलुस पाणीपुरवठा योजनेतील भूसंपादनाच्या कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

नाट्यगृहाचा प्रश्न लवकरच सोडवणार

आटपाडीमधील ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात येणारे प्रस्तावित नाट्यगृह आणि स्मारक जमीन अधिग्रहणामुळे रखडले आहे, याकडे आमदार अनिल बाबर यांनी लक्ष वेधले. त्यावर याबाबत नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढू, असे शिंदे म्हणाले. आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे गीतरामायणकार गदिमा हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या लौकिकाला साजेसे स्मारक उभे करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Continue reading

युद्धबंदीमुळे इस्रायलने टाळले रोजचे 17 अब्ज रुपयांचे नुकसान!

इस्त्रायल-इराण युद्धात आतापर्यंत इराणला मोठं मानवी आणि आर्थिक नुकसान झालं आहे. इराणच्या सरकारी आकडेवारीनुसार 430 नागरिक मृत तर 3,000 जखमी आहेत. एका स्वतंत्र संस्थेनुसार एकूण 722 मृत असून त्यात 200 लष्करी जवान, अधिकारी आहेत. दुसरीकडे, मानवहानी कमी झाली असली...

इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर

इंडोनेशियातील माउंट लेवोटोबी लाकी या ज्वालामुखीच्या ताज्या उद्रेकामुळे मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून खालील गोष्टी दिसून येत आहेत.  1. बालीसह अनेक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द किंवा विलंबित झाली आहेत.  2. ज्वालामुखीच्या...

कोरेगावचा योगगुरू देतोय व्हिएतनाममध्ये योगाचे धडे!

साताऱ्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील गणेश गोपीनाथ खताळ व्हिएतनाममध्ये योगगुरू बनला असून तिथल्या नागरिकांना योगाचे धडे देतोय. शेतकरी कुटुंबातील गणेशची गोष्ट एकदम प्रेरणादायक आहे! गणेशचा जन्म कोरेगाव तालुक्यातील भाडळे गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला; त्याला लहानपणी शाळेत असताना योगाची...
Skip to content