Homeन्यूज ॲट अ ग्लांसअजित पवारांच्या अपघाती...

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला ‘खराती’ वळण?

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला आता एक वेगळे वळण मिळाले असून तपासात काही धक्कादायक दुवे समोर आले आहेत. २८ जानेवारी रोजी झालेल्या या दुर्दैवी दुर्घटनेच्या संदर्भात नवीन माहिती उजेडात आल्याने, या प्रकरणातील गूढ अधिक वाढले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी ‘अशोक खरात’ नावाच्या व्यक्तीच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) आणि मोबाईल संदेशांबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. अपघाताच्या नेमक्या कालावधीत खरातच्या मोबाईलवर झालेले संदेश आणि एका पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहार यांचा या घटनेशी काही संबंध आहे का, असा सवाल दमानिया यांनी पुराव्यांसह उपस्थित केला आहे.

या नवीन खुलाशानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले असून या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. दुसरीकडे, हे संवेदनशील कॉल रेकॉर्ड्स लीक कसे झाले, याबद्दलही सरकारने कडक तपासाचे आदेश दिले असून, आगामी काळात या प्रकरणातून मोठे सत्य समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

दिल्ली विधानसभा परिसरात मुखवटाधारी व्यक्तीकडून सुरक्षेची ऐसीतैशी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा संकुलात सोमवारी दुपारी सुरक्षेचा मोठा भंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एका मुखवटाधारी व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या 'टाटा सफारी' कारने विधानसभेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर पुष्पगुच्छ ठेवला...

माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे!

माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...
Skip to content