Homeन्यूज ॲट अ ग्लांसअणुऊर्जा नियामक परिषदेच्या...

अणुऊर्जा नियामक परिषदेच्या अध्यक्षपदी ए. के. बालासुब्रमणयन कार्यरत

प्रसिद्ध शास्त्रज्ञ ए. के. बालासुब्रमणयन यांनी नववर्षाच्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला मुंबईतील अणुऊर्जा नियामक परिषद (एईआरबी) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी डॉ. डी. के. शुक्ला यांच्याकडून पदभार स्वीकारला. एईआरबीमध्ये दाखल होण्यापूर्वी बालासुब्रमणयन यांनी प्रकल्प डिझाईन सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. ही समिती प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर – पीएचडब्ल्यूआर आधारित अणुऊर्जा प्रकल्पांसाठी कार्यरत आहे.

ए. के. बालासुब्रमण्यन एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ असून, ते अणु अभियांत्रिकीचे प्रशिक्षण घेतलेले यांत्रिकी शाखेचे अभियंता आहेत. इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे ते फेलो आहेत. अणुऊर्जा प्रकल्पांची रचना, विकास, सुरक्षा मूल्यांकन, बांधकाम व कार्यान्वयन या सर्व क्षेत्रांत त्यांना जवळपास 40 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी पीएचडब्ल्यूआर अणुभट्ट्यासांठी

व्यवस्थापन धोरण तयार केले आहे. त्यातली उपकरणे जसजशी जुनी होतात, त्यांची सुरक्षितता आणि कार्यक्षमता टिकवण्यासाठी आखलेली तपासणी, देखभाल आणि सुधारणा यांच्या व्यवस्थापनात, योजना विकासात त्यांना व्यापक अनुभव आहे.

पहिल्यांदाच तयार केलेल्या प्रणालींच्या नवोन्मेषी रचनांमध्ये, सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये आणि स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अणुभट्टी तंत्रज्ञानातले ते तज्ज्ञ मानले जातात. पीएचडब्ल्यूआरव्यतिरिक्त इतर अणुभट्ट्यांच्या (रिअॅक्टर) तंत्रज्ञानातलेही त्यांना चांगले ज्ञान आहे. पूर्वी ते न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल-भारतीय अणुऊर्जा महामंडळ)च्या संचालक (तांत्रिक) पदावर कार्यरत होते. अणुभट्टी तंत्रज्ञान व सुरक्षा यावर अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content