Homeएनसर्कलवृक्षछाटणीवर झाले वैज्ञानिक...

वृक्षछाटणीवर झाले वैज्ञानिक प्रशिक्षण

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल कामगार, ठेकेदारांचे उद्यानतज्ज्ञ आणि पालिका अधिकाऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने वृक्षसंवर्धन व छाटणीचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. वृक्षतज्ज्ञ विवेक राणे यांनी टी-वॉर्ड येथील सभागृहात परिमंडळ पाच व परिमंडळ सहाच्या कार्यक्षेत्रासाठी हे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत सर्व ठेकेदार, त्यांचे उद्यानतज्ज्ञ, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ वृक्ष अधिकारी, सहाय्यक उद्यान अधीक्षक तसेच परिमंडळ पाच आणि सहाचे उप उद्यान अधीक्षक उपस्थित होते.

वृक्षछाटणी

कार्यशाळेत वृक्षछाटणीच्या वैज्ञानिक पद्धती, झाडांच्या जोखमीचे मूल्यमापन करून अनावश्यक वृक्षतोड टाळण्याचे उपाय आणि असंघटित छाटणी टाळण्याच्या योग्य पद्धती शिकविण्यात आल्या. राणे यांनी थ्री-कट पद्धत, कॅनोपी कपात पद्धत तसेच इतर वृक्षसंवर्धन तंत्रज्ञानांचे प्रात्यक्षिक दाखवले. प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्षस्थळी झाडांचे मूल्यमापन कसे करावे आणि योग्यप्रकारे फांद्या कशा छाटाव्या याचे मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्ष व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात आला.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content