Homeचिट चॅटचेंबूरमध्ये रंगला मल्लखांब,...

चेंबूरमध्ये रंगला मल्लखांब, जिमनॅस्टिक्स खेळाडूंचा कौतुकसोहळा

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मल्लखांब आणि जिमनॅस्टिक्स खेळात चमकदार कामगिरी करण्याऱ्या, तसेच राष्ट्रीय जिमनॅस्टिक्स स्पर्धेतदेखील पदके जिंकण्याऱ्या खेळाडूंचा कौतुक सोहळा शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार अनिल देसाई यांच्या पुढाकाराने मुंबईतल्या चेंबूर येथील नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या सभागृहात नुकताच आयोजित करण्यात आला होता.

उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदकतालिकेत द्वितीय क्रमांक पटकाविला. गेल्या दोन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांप्रमाणे यंदादेखील महाराष्ट्राच्या यशात जिमनॅस्टिक, मल्लखांब खेळाडूंचा मोठा वाटा होता. यंदा महाराष्ट्राने जिमनॅस्टिक्समध्ये ४ सुवर्ण, १ रौप्य, तर मल्लखांब खेळात ४ सुवर्ण, ४ रौप्य, ४ कांस्य पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली, तसेच सूरत येथे झालेल्या राष्ट्रीय जिमनॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेतदेखील महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगले यश संपादन केले. या दोन्ही स्पर्धांतील पदकविजेत्या खेळाडूंचा गौरव खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

या समारंभास लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुबोध आचार्य, बृहन्मुंबई जिल्हा जिम्नास्टिक संघटनेचे अध्यक्ष इंद्रजीत राठोड, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष करुणाकर शेट्टी, सेना उबाठाचे चेंबूर विधानसभा विभागप्रमुख प्रमोद शिंदे, मुंबई जिमनॅस्टिक संघटनेचे उपाध्यक्ष शरद भोसले, नारायणराव आचार्य विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री शिव छत्रपती पुरस्कार तसेच उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कारप्राप्त राहुल ससाणे, सुनील रणपिसे, योगेश पवार, सुनील गंगावणे हेदेखील उपस्थित होते. या खेळाडूंच्या कौतुक सोहळ्याच्या आयोजनासाठी बृहन्मुंबई जिल्हा जिमनॅस्टिक संघटना, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना, स्पोर्ट्स अॅक्रोबॅटिक्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र लोकमान्य शिक्षण संस्था, शरद आचार्य क्रीडा केंद्र, सुकहारा स्पोर्ट्स अकॅडमी या सर्वांचेदेखील मोलाचे सहकार्य मिळाले.

Continue reading

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...

पेट्रोल-डिझेलची दरवाढ अटळ?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे भारतातील सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांच्या तोट्यात मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या कंपन्यांना सध्या दरमहा सुमारे ३०,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे....
Skip to content