Homeचिट चॅटचेंबूर जिमखाना बुद्धिबळः...

चेंबूर जिमखाना बुद्धिबळः अनिरुद्ध पोटावाड यंदाही विजेता

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याने क्रिस्टल कम्युनिटी हॉल, जेड १ आणि जेड २ हॉलमध्ये आयोजित केलेल्या दुसऱ्या ऑल इंडिया फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत यंदादेखील गतविजेत्या अनिरुद्ध पोटावाडने चमकदार कामगिरी करताना विजेतेपद कायम राखले.

अनिरुद्धने या स्पर्धेत ९ पैकी ८.५ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. पारस भोईर आणि अर्णव कोळी यांचा अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक लागला. आयएम समीर खाटमाळे यांनी ९ पैकी ८ गुणांची कमाई केली. आयएम सौम्या स्वामीनाथनने या स्पर्धेत ९ पैकी ७ गुणांची कमाई केली.

स्पर्धेचे संयोजक आणि सीजी बुद्धिबळ विभागाचे सचिव बाळकृष्ण परब यांनी खेळाडूंचा मिळालेला मोठा प्रतिसाद पाहून आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी चेंबूर जिमखान्याला स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व संबंधित बुद्धिबळ संघटनांचे आभार मानले. मध्य उपनगरातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ६०९ खेळाडूंचा सहभाग लाभला होता. या स्पर्धेत एकूण २ लाख रुपयांची पारितोषिके होती. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content