Homeचिट चॅटऑस्ट्रेलियातल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिन्मय ढवळे,...

ऑस्ट्रेलियातल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिन्मय ढवळे, अजय कृष्णन जोडी विजेती 

ऑस्ट्रेलिया येथे क्वीन्स लँड बॅडमिंटन असोसिएशनने नुकत्याच ‌आयोजित केलेल्या एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी‌ बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडी चिन्मय ढवळे,अजय कृष्णन यांनी बाजी मारली.

या स्पर्धा ओपन ए, बी, सी व डी ग्रुपमध्ये घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत भारतीय जोडी चिन्मय ढवळे, मुंबई व अजय कृष्णन, केरळ यांनी “बी” ग्रुपमध्ये दुहेरीचे विजेतेपद मिळवले. या गटात‌ 14 जोड्यांनी भाग घेतला होता.  एक गेम 31 पॉईंटचा होता. स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यातून प्रथम चार जोड्यांनी उपांत्य फेरी गाठली.

चिन्मय व अजयने उपांत्य फेरीत पहिले मांनांकन देण्यात आलेल्या लुकान लान व दवे नऊंग जोडीचा सनसनाटी पराभव केला. त्यांनी अंतिम फेरीमध्ये तिसऱ्या मानांकित सुमित पुरी, राजेश वर्गीस जोडीवर सहजरीत्या मात करून दुहेरीचे विजेतेपद पटकावले. चिन्मय ढवळे मुंबईचा असून त्याला सुरुवातीच्या काळात आयकर विभागाचे माजी निरीक्षक व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू मिलिंद पूर्णपात्रे यांचे मार्गदर्शन लाभले होते. चिन्मयने गेल्या महिन्यातसुद्धा 35 वर्षांवरील दुहेरीच्या गटात जुड वर्णकुला यांच्या साथीने विजेतेपद मिळवले होते.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content