Homeकल्चर +आरोग्य विज्ञान विद्यापीठात...

आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘अवघा रंग एक झाला’!

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात गणेशोत्सवानिमित्त ‘अवघा रंग एक झाला’ नाटकाचे नुकतेच अभिवाचन करण्यात आले. या कार्यक्रमास कुलगुरु लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त)समवेत लेफ्टनन्ट जनरल राजीव कानिटकर (निवृत्त), प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, बोधीकिरण सोनकांबळे, डॉ. देवेंद्र पाटील, ब्रिग. सुबोध मुळगुंद आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी त्यांचे कुटुंबीय यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रित आणण्यासाठी कुलगुरु लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, वारकरी संप्रदायाची ओळख व अध्यात्मिक भाव यांचा अनोखा मेळ ’अवघा रंग एक झाला’ नाटकाचे अभिवाचन अनुभवण्यास मिळाला, असे कुलगुरु कानिटकर यांनी सांगितले.

सुप्रसिध्द लेखिका व दिग्दर्शिका पल्लवी पटवर्धन लिखित नाटकाचे अभिवाचन पल्लवी पटवर्धनसमवेत श्रीराम गोरे, श्रीया जोशी, रेखा देशपांडे, अमोघी कुलकर्णी, सुगंधा शुक्ल या सहकलाकारांनी केले तसेच वंदन वेलदे यांनी संगीत दिले. या अभिवाचनातून पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांचा अनुभव, प्रसंग व भक्तीचा लेखजोखा आपल्या ओजस्वी वाणीत मांडला. अभिवाचनात सहभागी कलाकारांचा कानिटकर यांच्या हस्ते रोपटे व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे समन्वयन जनंसपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठाच्या समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव डॉ. स्वप्नील तोरणे, सदस्य संदीप राठोड, मधुकर भिसे, संदीप महाजन, निलेश ओहोळ, आकांक्षा भोईर, आरती आहेर, नाना परभणे, रविंद्र रांधव यांनी परिश्रम घेतले.

Continue reading

युद्धबंदीमुळे इस्रायलने टाळले रोजचे 17 अब्ज रुपयांचे नुकसान!

इस्त्रायल-इराण युद्धात आतापर्यंत इराणला मोठं मानवी आणि आर्थिक नुकसान झालं आहे. इराणच्या सरकारी आकडेवारीनुसार 430 नागरिक मृत तर 3,000 जखमी आहेत. एका स्वतंत्र संस्थेनुसार एकूण 722 मृत असून त्यात 200 लष्करी जवान, अधिकारी आहेत. दुसरीकडे, मानवहानी कमी झाली असली...

इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर

इंडोनेशियातील माउंट लेवोटोबी लाकी या ज्वालामुखीच्या ताज्या उद्रेकामुळे मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून खालील गोष्टी दिसून येत आहेत.  1. बालीसह अनेक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द किंवा विलंबित झाली आहेत.  2. ज्वालामुखीच्या...

कोरेगावचा योगगुरू देतोय व्हिएतनाममध्ये योगाचे धडे!

साताऱ्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील गणेश गोपीनाथ खताळ व्हिएतनाममध्ये योगगुरू बनला असून तिथल्या नागरिकांना योगाचे धडे देतोय. शेतकरी कुटुंबातील गणेशची गोष्ट एकदम प्रेरणादायक आहे! गणेशचा जन्म कोरेगाव तालुक्यातील भाडळे गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला; त्याला लहानपणी शाळेत असताना योगाची...
Skip to content