Homeकल्चर +आरोग्य विज्ञान विद्यापीठात...

आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘अवघा रंग एक झाला’!

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात गणेशोत्सवानिमित्त ‘अवघा रंग एक झाला’ नाटकाचे नुकतेच अभिवाचन करण्यात आले. या कार्यक्रमास कुलगुरु लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त)समवेत लेफ्टनन्ट जनरल राजीव कानिटकर (निवृत्त), प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, बोधीकिरण सोनकांबळे, डॉ. देवेंद्र पाटील, ब्रिग. सुबोध मुळगुंद आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी त्यांचे कुटुंबीय यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रित आणण्यासाठी कुलगुरु लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, वारकरी संप्रदायाची ओळख व अध्यात्मिक भाव यांचा अनोखा मेळ ’अवघा रंग एक झाला’ नाटकाचे अभिवाचन अनुभवण्यास मिळाला, असे कुलगुरु कानिटकर यांनी सांगितले.

सुप्रसिध्द लेखिका व दिग्दर्शिका पल्लवी पटवर्धन लिखित नाटकाचे अभिवाचन पल्लवी पटवर्धनसमवेत श्रीराम गोरे, श्रीया जोशी, रेखा देशपांडे, अमोघी कुलकर्णी, सुगंधा शुक्ल या सहकलाकारांनी केले तसेच वंदन वेलदे यांनी संगीत दिले. या अभिवाचनातून पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांचा अनुभव, प्रसंग व भक्तीचा लेखजोखा आपल्या ओजस्वी वाणीत मांडला. अभिवाचनात सहभागी कलाकारांचा कानिटकर यांच्या हस्ते रोपटे व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे समन्वयन जनंसपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठाच्या समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव डॉ. स्वप्नील तोरणे, सदस्य संदीप राठोड, मधुकर भिसे, संदीप महाजन, निलेश ओहोळ, आकांक्षा भोईर, आरती आहेर, नाना परभणे, रविंद्र रांधव यांनी परिश्रम घेतले.

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content