Homeपब्लिक फिगरतिकिटे न मिळाल्याने...

तिकिटे न मिळाल्याने चाकरमान्यांचा संताप!

यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकणदरम्यान सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांचे बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत ते फुल्ल झाल्याचे दिसले. त्यामुळे हजारो कोकणवासीय चाकरमान्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोकण रेल्वेची तिकिटे उपलब्ध करून देण्याबरोबरच तिकीट आरक्षणात काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

आमदार भास्कर जाधव यांनी याबाबतचे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकणदरम्यान सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांचे बुकिंग फुल्ल झाल्याचे दिसले. चाकरमान्यांमध्ये तिकिटे न मिळाल्यामुळे तीव्र संतापाची भावना आहे. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यातच खासगी बसचालकाकडून गणपती उत्सवाच्या काळात २ ते अडीच हजार रुपयांचा दर लावला जात आहे. ही अक्षरशः लूटमार आहे. ही बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेची तिकिटे उपलब्ध करून द्यावीत, खासगी वाहनांच्या दरांवर नियंत्रण आणावे व तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी या पत्राद्वारे केली आहे.

1 COMMENT

  1. हे तर दरवर्षीचेच रडगाणे आहे. राजकारणी , रेल्वेमंत्री म्हटले तर त्यांच्या हातातील गोष्ट आहे. पण आपण लोकांसाठीच आहोत, लोकांसाठीच काम करतो हे प्रत्येक राजकारणी मग तो स्थानिक असो किंवा दिल्लीश्वर असो, अगदी मोठमोठ्या सभा घेवून किंवा माध्यमाद्वारे सांगत असतो ते गेले कुठे? ह्यासाठी कोणी आ आंदोलन करेल का?

Comments are closed.

Continue reading

युद्धबंदीमुळे इस्रायलने टाळले रोजचे 17 अब्ज रुपयांचे नुकसान!

इस्त्रायल-इराण युद्धात आतापर्यंत इराणला मोठं मानवी आणि आर्थिक नुकसान झालं आहे. इराणच्या सरकारी आकडेवारीनुसार 430 नागरिक मृत तर 3,000 जखमी आहेत. एका स्वतंत्र संस्थेनुसार एकूण 722 मृत असून त्यात 200 लष्करी जवान, अधिकारी आहेत. दुसरीकडे, मानवहानी कमी झाली असली...

इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर

इंडोनेशियातील माउंट लेवोटोबी लाकी या ज्वालामुखीच्या ताज्या उद्रेकामुळे मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून खालील गोष्टी दिसून येत आहेत.  1. बालीसह अनेक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द किंवा विलंबित झाली आहेत.  2. ज्वालामुखीच्या...

कोरेगावचा योगगुरू देतोय व्हिएतनाममध्ये योगाचे धडे!

साताऱ्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील गणेश गोपीनाथ खताळ व्हिएतनाममध्ये योगगुरू बनला असून तिथल्या नागरिकांना योगाचे धडे देतोय. शेतकरी कुटुंबातील गणेशची गोष्ट एकदम प्रेरणादायक आहे! गणेशचा जन्म कोरेगाव तालुक्यातील भाडळे गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला; त्याला लहानपणी शाळेत असताना योगाची...
Skip to content