Homeटॉप स्टोरीआता शिवसेनेच्या शाखा-शाखांमध्ये...

आता शिवसेनेच्या शाखा-शाखांमध्ये रंगणार चिन्हावरुन सामना!


आता चिन्हावरुन पुन्हा महाभारत होण्याची चिन्हं आहेत. शिवसेना आणि शिवसेनेचा ठाकरे गट यानिमित्ताने आमने-सामने आले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईसह राज्यात पुन्हा राडा होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी पुण्यात नुकत्याच झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशानंतर हा सामना सुरू झाल्याचे बोलले जाते.

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आदेशानंतर ठाकरे गटातील पदाधिकारी आपापल्या भागातील पोस्टर्स, बॅनर तसेच शाखांबाहेर लावलेल्या बोर्डांवरील धनुष्यबाण चिन्हं काढायच्या कामाला लागले आहेत. परंतु यावरून शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. मुंबईतल्या प्रभादेवी भागात अशीच परिस्थिती झाली आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या बाजूला एका लोखंडी बोर्डावर तिथे असलेले धनुष्यबाणाचे चिन्ह काढत असताना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने मारल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. ठाकरे गट आणि शिवसेनेकडून याबद्दल एकमेकांविरोधात दादर पोलिसठाण्यात तक्रार दिली.

शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या निधीतून हे लोखंडी पोस्टर लावले असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून खोडसाळपणा केल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई आणि पुणे येथे झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्याला भागात जिथे जिथे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आहे ते काढा आणि मशाल चिन्ह लावा असे आदेश दिले होते. त्यानुसार ठाकरे गटाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. यापूर्वीपण शाखांवरुन दोन्ही बाजूचे पदाधिकारी परस्परांशी भिडल्याचे राज्याने पाहिले आहे. खास करुन ठाणे, मुंबईत हा प्रकार घडला होता.

पुण्याच्या सभेत ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार केला. त्यांनी अत्यंत जहाल भाषेचा वापर केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पण तिखट प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह गेले तर उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळाले आहे.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content