Homeबॅक पेजअमरावतीत मध्यरात्री माथेफिरूंनी...

अमरावतीत मध्यरात्री माथेफिरूंनी फोडल्या तीस गाड्या

अमरावती शहरामध्ये एका दुचाकीने जाणाऱ्या तीन युवकांनी रस्त्याने जाणाऱ्या तब्बल जवळपास ३० ते ३५ गाड्या फोडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस गाड्या फोडणाऱ्यांचा शोध घेत आहे. शहरात मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे पोलीसयंत्रणा संतर्क झाली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास तीन युवक पंचवटी चौकातून मोपेडने निघाले. यावेळी त्यांनी ज्या चारचाकी गाड्या दिसल्या त्यावर दगडफेक केली. लाचलचुपत प्रतिबंधक ऑफिसच्या समोरील इमारतीच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या गाड्यांनासुद्धा या माथेफिरूंनी लक्ष्य केले. हे तीनही युवक पंचवटीपासून तर तपोवन गेटच्या आत गेले. मात्र यादरम्यान ज्या काही चारचाकी गाड्या त्यांना मार्गात दिसल्या त्या त्यांनी दगड मारून फोडल्या. पंचवटी ते तपोवनपर्यंतचे सिसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content