Homeटॉप स्टोरीनारायण राणेंची खासदारकी...

नारायण राणेंची खासदारकी रद्द करा!

रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५ वर्षे निवडणूक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी घालावी, अशा आशयाची कायदेशीर नोटीस शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणुक आयोगाला पाठवली आहे. अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. किशोर वरक ,अ‍ॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत त्यांनी ही नोटीस पाठवल्याचे समजते.

निवडणूक प्रचाराचा कालावधी ०५/०५/२०२४ रोजी संपलेला असतानाही भाजपा कार्यकर्ते ०६/०५/२०२४ रोजीसुद्धा नारायण राणे यांचा प्रचार करीत होते. नारायण राणेसमर्थक प्रचार संपलेला असतानाही ई.व्ही.एम. मशीन दाखवून राणेंनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले की, जर राणेंना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याकडे निधी मागायला यायचे आहे. लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधीसुद्धा मिळणार नाही. १३ एप्रिलला रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी ही धमकी दिल्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

राणे

निवडणूक आचारसंहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केला आहे. त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगाने चौकशी करावी अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिसामार्फत केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सात दिवसात या नोटीसवर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल असे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले.

अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपाच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या मदतीने करण्यात आले हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत व त्याबाबत नागरिक म्हणून भारतावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले.

Continue reading

राष्ट्रीय महामार्गांवरून आता ओव्हरलोड वाहनेही धावणार सुसाट!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवरील अतिभारित (ओव्हरलोडेड) वाहनांसाठी अतिरिक्त शुल्क आकारणारी कायदेशीर सुधारणा अधिसूचित केली ाहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरून अतिरिक्त शुल्क देऊन नियमापेक्षा जास्त माल घेऊन जाण्यास मालवाहतूकदारांना सहज शक्य होणार आहे. परिणामी राष्ट्रीय महामार्गांवर आता...

‘अच्चप्पास् अल्बम’ येत्या 24 एप्रिलला होणार प्रदर्शित

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ म्हणजेच एनएफडीसी आपला मल्याळम चित्रपट ‘अच्चप्पास् अल्बम’ (आजीचा अल्बम) येत्या 24 एप्रिलला देशभर प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात कौटुंबिक कल्पनारम्य कथा, विनोद आणि भावनांच्या कल्लोळाचा एक अनोखा मेळ...

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...
Skip to content