Homeमुंबई स्पेशल२१ जुलैपर्यंत मुंबईत...

२१ जुलैपर्यंत मुंबईत फक्त ऑफलाईन विवाह नोंदणी!

मुंबई महापालिकेच्या संगणकीय कामकाज अद्ययावत करण्यात येत असल्याने सध्या बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या २१ जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीने होणारी विवाह नोंदणी होणार नाही. परंतु या काळात ही नोंदणी ऑफलाईन पद्धतीने सुरू असेल, असे महापालिकेने जाहीर केले आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध नागरी सेवासुविधांविषयीची कार्यवाही गेल्या काही वर्षांपासून संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. या अनुषंगाने संगणकीय प्रणालीचे अद्ययावतीकरण व सक्षमीकरण गरजेचे असल्याने महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे सध्या याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. या अद्ययावतीकरणाच्या अंमलबजावणीकरीता संबंधित संगणकीय प्रणालीचे कामकाज २१ जुलैपर्यंत बंद राहणार आहे.

या काळात महापालिकेच्या काही सेवासुविधांविषयीची कार्यवाही अल्प कालावधीसाठी ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने होणारे विवाह नोंदणीचे कामकाजदेखील बंद राहणार असून यामुळे पर्यायी स्वरुपात विवाह नोंदणीविषयक कार्यवाही ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली.

संगणकीय प्रणाली पूर्ववत होईपर्यंत महापालिकेच्या सर्व २४ विभागांमधील विवाह निबंधकाकडे ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील आणि मुलाखतीची तारीख व वेळ देण्यात येईल. विवाह नोंदणी प्रमाणपत्र संबित संगणकीय प्रणालीच्या अद्ययावतीकरणाचे काम झाल्यानंतर प्रचलित पद्धतीने ऑनलाईन अर्ज केल्यावर प्राप्त होईल. याबाबत अधिक माहितीसाठी विभागातील विवाह निबंधकाकडे संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content