Homeकल्चर +मुस्लिम मराठी साहित्य...

मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फरझाना इक्बाल

गेल्या अनेक वर्षांपासून साहित्यक्षेत्रात अविरतपणे कार्यरत राहिलेल्या आणि विविध संस्था तसेच व्यासपीठांवरून साहित्यिक कार्याला सिद्ध करणाऱ्या मुंबईस्थित फरझाना इक्बाल-डांगे यांची नागपूर येथे १८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भारतीय मुस्लिम परिषद, डॉ. मेघनाथ साहा सांस्कृतिक विचार मंच, फुले-शाहू-आंबेडकरी विचार मंच आणि छवि पब्लिकेशन्स या संस्थांमार्फत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून प्रा. जावेद पाशा, प्रा. रमेश पिसे, डॉ. असलम बारी, डॉ. वहिद पटेल आदी मान्यवर निमंत्रित आहेत. हे संमेलन भारतीय संविधानाला समर्पित करण्यात आले आहे.

फरझाना  म. इकबाल डांगे ह्या शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या एम.ए. अर्थशास्त्र पदवीधर असून त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दादर शाखेच्या त्या माजी अध्यक्ष आणि सध्या मुंबई जिल्ह्याच्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा साहित्यिक व इतर क्षेत्रातील सेवेबद्दल सन्मान करण्यात आला आहे. सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या संस्थेतर्फे हमीद दलवाई पुरस्कारानेही त्या सन्मानित आहेत.

त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या “फर्ज फाऊंडेशन”च्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्या, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सांस्कृतिक विभाग माजी कार्याध्यक्षा व सध्या जवाहर बालमंचच्या त्या महाराष्ट्राच्या समन्वयक म्हणून काम पाहात आहेत. नाशिकच्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनातील कवयित्री संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी त्यांना मिळाली होती. आता नागपूर येथे भरणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल मराठी सारस्वत तसेच मुस्लिम समाजाकडून विशेषतः महिला वर्गाकडून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content