Homeकल्चर +जो त्याग करील...

जो त्याग करील त्याला जग लक्षात ठेवील!

जो आपल्या जीवनात त्याग करील त्याला जग लक्षात ठेवील, अशा शब्दांत नाशिक येथील अध्यात्म, ज्योतिष आणि वेदशास्त्रसंपन्न अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी त्यागाचे महत्त्व अधोरेखित केले.

ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी सुरू केलेल्या जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील वसंत व्याख्यानमालेचे यंदाही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले. यंदाच्या ३९व्या वर्षाच्या वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी ‘मानवी जीवनातील पाच विशेष योग’ या विषयावरील व्याख्यानाने गुंफले.

प्रा. नयना रेगे यांनी अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचा परिचय करुन दिल्यानंतर भगरे गुरुजी यांनी सुमारे दीड तास अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. आज आपल्याला आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांची नावे माहित नसतात, ज्यांनी हाडाची काडे करुन आपल्यासाठी संपत्ती जमवून ठेवलेली असते. परंतु महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यांची नावे आपण लक्षात ठेवतो, कारण ते आपल्या त्यागातून महान झाले आहेत, असे ते म्हणाले.

ज्या बापूंनी दोन गुंठे जमीन घेतली नाही, परंतु आज प्रत्येकाच्या खिशात बापू आहेत. राष्ट्रासाठी या महान विभूतींनी आपले जीवन झिजविले. त्यागाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या बलिदानामुळे आज त्यांना संपूर्ण विश्व लक्षात ठेवतो, असे गुरूजींनी सांगितले.

मानवी जीवनातील पाच विशेष योग या विषयावर आपले विचार मांडताना भगरे गुरुजी म्हणाले की, ८४ लक्ष योनींमधून महत्त्वाचा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे. सहजासहजी हा जन्म मिळत नाही. पण या मनुष्य जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मानवी जीवनातील पाच विशेष योग आपल्याला अंगिकारणे आवश्यक आहे. वास्तुयोग, कन्यादान योग, चारधाम यात्रा, गोदान आणि मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हे पाच योग महत्त्वाचे आहेत. ते व्यावहारिक जीवनात अंगिकारणे शक्य आहे आणि ते अंगिकारले तर आपल्या मानवी जीवनाचे, मनुष्य जन्माचे सार्थक होईल.

हे पाचही योग अत्यंत सोप्या शब्दांत अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी समजावून सांगितले. कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या काळातसुद्धा चिकाटीने या वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले याबद्दल अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी विजय वैद्य यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content