Homeकल्चर +जो त्याग करील...

जो त्याग करील त्याला जग लक्षात ठेवील!

जो आपल्या जीवनात त्याग करील त्याला जग लक्षात ठेवील, अशा शब्दांत नाशिक येथील अध्यात्म, ज्योतिष आणि वेदशास्त्रसंपन्न अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी त्यागाचे महत्त्व अधोरेखित केले.

ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी सुरू केलेल्या जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील वसंत व्याख्यानमालेचे यंदाही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले. यंदाच्या ३९व्या वर्षाच्या वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी ‘मानवी जीवनातील पाच विशेष योग’ या विषयावरील व्याख्यानाने गुंफले.

प्रा. नयना रेगे यांनी अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचा परिचय करुन दिल्यानंतर भगरे गुरुजी यांनी सुमारे दीड तास अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. आज आपल्याला आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांची नावे माहित नसतात, ज्यांनी हाडाची काडे करुन आपल्यासाठी संपत्ती जमवून ठेवलेली असते. परंतु महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यांची नावे आपण लक्षात ठेवतो, कारण ते आपल्या त्यागातून महान झाले आहेत, असे ते म्हणाले.

ज्या बापूंनी दोन गुंठे जमीन घेतली नाही, परंतु आज प्रत्येकाच्या खिशात बापू आहेत. राष्ट्रासाठी या महान विभूतींनी आपले जीवन झिजविले. त्यागाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या बलिदानामुळे आज त्यांना संपूर्ण विश्व लक्षात ठेवतो, असे गुरूजींनी सांगितले.

मानवी जीवनातील पाच विशेष योग या विषयावर आपले विचार मांडताना भगरे गुरुजी म्हणाले की, ८४ लक्ष योनींमधून महत्त्वाचा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे. सहजासहजी हा जन्म मिळत नाही. पण या मनुष्य जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मानवी जीवनातील पाच विशेष योग आपल्याला अंगिकारणे आवश्यक आहे. वास्तुयोग, कन्यादान योग, चारधाम यात्रा, गोदान आणि मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हे पाच योग महत्त्वाचे आहेत. ते व्यावहारिक जीवनात अंगिकारणे शक्य आहे आणि ते अंगिकारले तर आपल्या मानवी जीवनाचे, मनुष्य जन्माचे सार्थक होईल.

हे पाचही योग अत्यंत सोप्या शब्दांत अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी समजावून सांगितले. कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या काळातसुद्धा चिकाटीने या वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले याबद्दल अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी विजय वैद्य यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content