Homeचिट चॅटईश्वरसेवा समजून काम...

ईश्वरसेवा समजून काम करूया – अविनाश दौंड

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना जगाला हेवा वाटेल असा पुरोगामी महाराष्ट्र घडविणारे थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०५ हुतात्मे आणि जगभरातील लक्षावधी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शाहिद झालेले कामगार कार्यकर्ते, कामगार नेते यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन करून बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी कोरोनाच्या या काळात साधनसामुग्रीचा तुटवडा असला तरी रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा समजून सर्वोत्तम सेवा द्यावी, असे आवाहन सरकारी कर्मचाऱ्यांना केले आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत देशस्थिती अतिशय भयावह झाली असून देशात आरोग्य आणिबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात रोज ६५ ते ७० हजार नवीन रुग्ण आढळत असून दुर्दैवाने रोज ५०० नागरिक बळी पडत आहेत. मुंबईत तर उद्रेक झाला असून रुग्णालयात बेड, ऑॅक्सिजन, इंजेक्शन, लस यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या १६ महिन्यांत कोरोनाशी लढताना हजारो शासकीय कर्मचारी, प्रामुख्याने आरोग्य सेवक, पोलीस, वाहक, चालक यांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या वारसांना तातडीने ५० लक्ष विमा रक्कम आणि अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.

कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या शासन दरबारी बराच काळ प्रलंबित आहेत आणि पुढील काळात त्यासाठी संघर्षसुद्धा करावा लागणार आहे. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त ज्येष्ठ नेते र. ग. कर्णिक यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आजच्या कठीण काळात कर्मचाऱ्यांनी शासनाला तन, मन आणि धनाने सहकार्य केले पाहिजे. यापुढे समाज माध्यमांवर व्यक्त होताना आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. संपूर्ण जिल्ह्यात एकमेकांशी कायम संपर्कात राहून अभावग्रस्तांना सर्वतोपरी मदत करावी. याकामी राहत्या ठिकाणीसुद्धा पुढाकार घ्यावा. तसेच अनेक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोना होऊन ते बरे झाले आहेत. अशांनी लस घेण्यापूर्वी प्लाझ्मा द्यावा देण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही दौंड यांनी केले आहे.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content