Homeहेल्थ इज वेल्थआता गरजूंनी 'जितो'कडून...

आता गरजूंनी ‘जितो’कडून न्या ऑक्सिजन भाड्यावर!

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच जितो, या संघटनेच्या गोरेगाव विभागाने मुंबईतल्या जोगेश्वरी ते दहीसर या परिसरातल्या ऑक्सिजनची गरज असलेल्या रूग्णांसाठी नाममात्र भाड्याने ऑक्सिजनची सेवा सुरू केली आहे.

कोरोनाग्रस्तांना अनेकदा श्वसनाचा त्रास होतो आणि त्यांना ऑक्सिजनची गरज भासते. परंतु अनेकदा रूग्णांना रूग्णालयात ऑक्सिजनचा बेड मिळू शकत नाही. अशावेळी त्यांना घरच्या घरीच उपचार घ्यावे लागतात. अशा रूग्णांसाठी जितोच्या गोरेगाव विभागाने ही योजना हाती घेतली आहे. यामध्ये संघटनेकडून रूग्णासाठी पाच लीटरच्या ऑक्सिजनचे मशीन पुरवले जाईल.

यासाठी पहिल्या सहा दिवसांसाठी दररोज १०० रूपये याप्रमाणे भाडे घेतले जाईल. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाकरीता दरदिवशी ५०० रूपये भाडे आकारले जाईल. जास्तीतजास्त १४ दिवसांपर्यंत हे मशीन वापरता येईल. १५व्या दिवशी ते संघटनेच्या कार्यालयात पुन्हा जमा करणे बंधनकारक राहील. याकरीता संघटनेकडून प्रत्येकी पाच हजार रूपये अनामत रक्कम म्हणून ठेवली जाईल. संघटनेच्या कोणातरी सदस्याने या रूग्णाला ऑक्सिजनचे मशीन पुरविण्याची शिफारस देणे बंधनकारक करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ९००४५१५१११, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेचे गोरेगाव विभागाचे अध्यक्ष कीर्ती कांथेर, मुख्य सचिव पंकज लोढा, सहसचिव रौनक शाह आणि खजिनदार कविता शाह यांनी केले आहे. गरजूंना आपली मागणी ऑनलाईन फॉर्म भरूनही नोंदविता येईल. यासाठी https://forms.gle/LYxTefarzQG7KbE67 येथे संपर्क साधावा.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content