Homeटॉप स्टोरीमुंबईतली पासपोर्ट कार्यालये...

मुंबईतली पासपोर्ट कार्यालये आजपासून बंद!

महाराष्ट्राच्या “ब्रेक द चेन” उपक्रमाचा भाग म्हणून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईच्या क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाने आज, दि. 23.04.2021पासून सर्व पासपोर्ट कार्यालय केंद्रे (पीएसकेएस) आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे (पीओपीकेएस)चे कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय महाराष्ट्र सरकारने कोरोना संक्रमण रोखण्याच्या संदर्भात जारी केलेला आदेशानुसार आहे. या आदेशानुसार तारीख 22.04.2021 च्या रात्री 8 पासून ते 01.05.2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात सामान्य कामांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, मुंबई अंतर्गत असलेल्या सर्व पीएसके (PSK) आणि पीओपीएसके (POPSK)मधील सेवा आणि क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मुंबई येथील चौकशी काउंटर 30.04.2021पर्यंत बंद राहतील.

सर्व अर्जदार, ज्यांनी आधीच त्यांच्या भेटीची वेळ निश्चित केली आहे, त्यांना सेवा प्रदाता कंपनी टीसीएसद्वारे एसएमएसद्वारे सूचित केले जात आहे. तथापि, सर्व अर्जदारांना कळवण्यात येते की, दिनांक 23.04.2021 ते 01.05.2021पर्यंत या कार्यालयाच्या कोणत्याही पासपोर्ट सेवा केंद्रात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तेव्हा त्यांनी कोणत्याही पीएसके/पीओपीएसकेला भेट देऊ नये.

अर्जदार क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, मुंबई या कार्यालयात दूरध्वनीद्वारे (022-26520016/17) संपर्क करू शकतात किंवा कोणत्याही माहितीसाठी इमेल (rpo.mumbai@mea.gov.in)द्वारे संपर्क साधू शकतात.  तसेच वेबसाइट www.passportindia.gov.in / ट्विटर हैंडल (@rpomumbai) किंवा क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाच्या फ़ेसबुक पेजच्या माध्यमातून पासपोर्ट कार्यालयाशी संपर्क साधता येईल.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content