Homeएनसर्कलप्रा. तु. शं....

प्रा. तु. शं. कुळकर्णी यांचे निधन

मराठवाड्यातील मागील पिढीतील साहित्यिक प्रा. तु. शं. कुळकर्णी यांचे आज दुपारी नांदेड येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह दान करण्यात आला.

तु. शं. हे दीर्घकाळ औरंगाबाद येथे सरस्वती भुवन कला – वाणिज्य महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक / विभागप्रमुख होते. त्यांनी कथा, काव्य आणि समीक्षा लिहिली. प्रा. प्रकाश मेदककर यांनी त्यांच्या निवडक साहित्याचे संकलन – संपादन केले आहे. साहित्य अकादमीसाठी आधुनिक मराठी कवितांचा एक प्रातिनिधिक संग्रह प्रा. कुळकर्णी यांनी संपादित केला आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेशी आणि परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाशी ते अनेक वर्षे निगडीत होते. परिषदेच्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. मसापने त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव केला होता. नरहर कुरुंदकर यांचे ते निकटचे स्नेही होते.

अनेकांनी प्रा. तु. शं. कुळकर्णी यांना औरंगाबादेत समर्थनगर ते सरस्वती भुवन परिसर आणि समर्थनगर ते साहित्य परिषद या रस्त्यावर पायी चालताना अनेकदा पाहिले आहे. ज्येष्ठ पत्रकार संजीव आणि राजीव कुळकर्णी यांचे ते वडील होत. 

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content