Homeहेल्थ इज वेल्थबोटाच्या हलक्याशा हालचालीने...

बोटाच्या हलक्याशा हालचालीने झाले उपचार व चालायला लागला रुग्ण!

बीड जिल्ह्यातील राजीव वरवडे यांच्यासाठी एका भीषण अपघातानंतर जीवन जणू थांबलं होतं. मानेच्या गंभीर दुखापतीमुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला अर्धांगवायू झाला होता. मात्र, मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे करण्यात आलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या स्पाइन सर्जरीमुळे त्यांना नवजीवन मिळालं असून, आज ते स्वतःच्या पायावर चालत आहेत. वरवडे कामावरून घरी परतत असताना झालेल्या अपघातात त्यांच्या मानेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले. या दुखापतीमुळे पाठीच्या कण्यावर प्रचंड दबाव आला आणि त्यांच्या खांद्याखालचा संपूर्ण भाग निकामी झाला. स्थानिक पातळीवर अनेक रुग्णालयांनी ही दुखापत अत्यंत गंभीर असल्याचे सांगत उपचार करण्यास नकार दिला. पुढील १५ दिवस ते कोणत्याही ठोस उपचारांशिवाय घरीच होते, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाला.

या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांनी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलशी संपर्क साधला. तेथे कन्सल्टंट स्पाइन सर्जन डॉ. मनिष कोठारी यांनी व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे तपासणी केली. या तपासणीत शरीर पूर्णतः निष्क्रिय असतानाही डाव्या पायाच्या अंगठ्यात झालेली अतिशय सूक्ष्म हालचाल त्यांनी ओळखली. हीच एक आशेची किरण ठरली. यानंतर वरवडे यांना तातडीने मुंबईत दाखल करण्यात आले. उपचारांमधील विलंबामुळे शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची होती. रुग्णाला आयुष्यभर व्हेंटिलेटरवर राहवे लागू शकते, अशी शक्यता होती. तरीही, कुटुंबियांनी धाडसाने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. डॉ. कोठारी आणि त्यांच्या टीमने सर्व्हायकल स्पाइन सर्जरी करून पाठीच्या कण्यावरील दबाव कमी केला आणि मणक्याला स्थिरता दिली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यात सकारात्मक बदल दिसू लागले. अवघ्या दोन आठवड्यांत वरवडे आधाराने चालू लागले आणि तीन महिन्यांत ते पूर्णपणे स्वतः चालण्यास सक्षम झाले.

डॉ. मनिष कोठारी म्हणाले की, “या केसमध्ये सर्वात मोठे आव्हान म्हणजे शस्त्रक्रिया यशस्वी झाली तरी रुग्ण व्हेंटिलेटरवर अवलंबून राहण्याची शक्यता होती. मात्र, आम्ही त्यांना स्वतंत्रपणे श्वास घेता यावा आणि सामान्य आयुष्य जगता यावे, यावर लक्ष केंद्रित केले.” जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके यांनी सांगितले की, “बीडसारख्या भागातील रुग्णांना अत्याधुनिक उपचारांची गरज असते. अशावेळी टर्शियरी केअर सेंटर्सनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारणे महत्त्वाचे असते. ही केस आमच्या बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाचे उदाहरण आहे.”

स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलताना राजीव वरवडे म्हणाले की, “अपघातानंतर सर्व काही संपल्यासारखं वाटत होतं. पण जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाले आणि आज मी पुन्हा चालू शकतोय. हे माझ्यासाठी नवजीवनच आहे.”

ही केस केवळ एका रुग्णाच्या पुनर्जन्माची कहाणी नसून, बीडसारख्या जिल्ह्यातील रुग्णांनी योग्यवेळी तज्ज्ञउपचार मिळविल्यास अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही आशा निर्माण होऊ शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. 

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content