Homeएनसर्कल‘ऑपरेशन थिरवल्लूर’ सुरू!

‘ऑपरेशन थिरवल्लूर’ सुरू!

पुणे येथील दक्षिण कमांड, सैनिकांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आजपासून “ऑपरेशन थिरवल्लूर” सुरू केले आहे.

लष्कराकडून नागरी प्रशासनाला मदत करण्याच्या हेतूने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत, तामिळनाडूमधील थिरवल्लूर जिल्ह्यातील गुम्मीडीपुंडी येथील राज्य औद्योगिक विकास  महामंडळ तामिळनाडू मर्यादितच्या औद्योगिक वसाहतीतील क्षेत्रात जुन्या कारखान्यातून कदाचित अनावधानाने गोळा केलेल्या, स्फोट न झालेल्या 10 टन दारूगोळ्यांची सुरक्षितरित्या विल्हेवाट लावण्यात आली.

नागरी अधिकाऱ्यांबरोबर तपशीलवार नियोजन आणि सहकार्यातून गेल्या अनेक आठवड्यांपासून क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा हा प्रत्यत्न सुरू असून ही एक उत्कृष्ट मोहीम आहे. लष्कर आणि तामिळनाडू राज्य सरकार यांच्या संयुक्त समन्वय आणि नियोजनाच्या माध्यमातून हे करण्यात आले. त्यांच्या विनंतीवरून संरक्षण मंत्रालयाने या मोहिमेला विशेष मान्यता दिली.

गुम्मीडीपुंडी आणि आसपासच्या परिसरातील सर्व नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेअंतर्गत, धातूचे भंगार असलेल्या  दारुगोळ्याच्या कोठारातून सापडलेल्या, स्फोट झाला नसलेल्या आयुधांचे वर्गीकरण करून आणि त्याची विल्हेवाट लावल्यानंतर, ती आता जमिनीखाली पुरण्यात आली.

काही वर्षांपूर्वी झालेल्या हिंसक स्फोटात एका कारखान्यातील कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर हे दारुगोळ्याचे कोठार उघडकीला आले होते. ही मोहीम आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content