Homeटॉप स्टोरीवैभव चेंबर्सबाहेर अधिकाऱ्यांच्या...

वैभव चेंबर्सबाहेर अधिकाऱ्यांच्या रांगा का लागतात?

राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारकडून होणारा भ्रष्टाचार फक्त मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनच चालतो असे मानण्याचे काही कारण नाही. तसे असते तर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयटी इमारतीसमोरील वैभव चेंबर्समध्ये अधिकाऱ्यांच्या रांगा का लागतात, त्यांना का जावे लागते, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे सदस्य नितेश राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.

हे सरदेसाई कोण?

राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था, भ्रष्टाचार आदी विषयांवर झालेल्या चर्चेत ते बोलत होते. या सरकारच्या काळात राजरोसपणे भ्रष्टाचार होत आहे. हे सरदेसाई कोण आहेत? वरूनच आलेले हे सरदेसाई आहेत. त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षाव्यवस्था कशाला लागते? त्यांना कोणाचा आशिर्वाद आहे? अधिकाऱ्यांना त्यांचे फोन का जातात? कंत्राटदारांना, ठेकेदारांना ते का फोन करतात, याची उत्तरे मिळाली पाहिजेत, असे ते म्हणाले.

रिझवी कॉलेजजवळ गाड्यांच्या रांगा का लागतात?

जंबो कोविड सेंटरच्या माध्यमातून तर भ्रष्टाचाराचे धिंडवडे निघाले आहेत. यामध्ये पुरवल्या जाणाऱ्या ब्लँकेट, फॅन आदी वस्तूंचा पुरवठा कोणाच्या इशाऱ्यावरून होतो? वांद्र्याच्या कार्टर रोडवरील रिझवी कॉलेजच्या बाजूला असलेल्या बंगल्यावर गाड्यांच्या रांगा का लागतात? नाईटलाईफ गँग येथे कार्यरत का राहते? हा दिनो मोरिया कोण आहे? दोन-चार चित्रपट त्याचे निघाले. हा सरकारचा जावई आहे का? मुंबई महापालिका, सरकारचे अधिकार याला कोणी दिले? हा कोणाचा मित्र आहे? चेतन कदम, आदित्य झव्हेरी, गोम्स यांचा कोविड सेंटरशी काय संबंध? तेथे काय लागते हे ठरवणारे हे कोण, असा सवाल राणे यांनी केला.

५ आणि ८ हे आकडे फार आवडीचे!

पाच आणि आठ हे आकडे यांच्या जास्त आवडीचे आहेत. ते दिवस आहेत, तास आहेत की टक्के आहेत, हे आपण ठरवा. तिथे सायन हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या बेडच्या बाजूला डेडबॉडी ठेवली जाते. टेंडर काढायचे नाही. राजरोस चोरी करायची हे आम्ही चालू देणार नाही. आम्ही गप्प बसणार नाही. यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. धारावी मॉडेलचे सरकार कौतुक करते. याचे श्रेय मुंबई महापालिकेला अजिबात नाही. त्यांना आयुक्त बदलावा लागला. हे सारे श्रेय आरएसएससारख्या स्वयंसेवी संस्थांचे आहे. त्यांनी काम केले म्हणून हे झाले. आम्हीही मुंबईत राहतो. आम्हालाही समजते. आम्ही काही लंडन, अमेरिकेत राहत नाही, असेही ते म्हणाले.

हा तर परिवार मंत्री!

सरकारने एक काम करावे. या राज्याला परिवहन मंत्री द्यावा. आमच्याकडे परिवहन मंत्रीच नाही. परिवार मंत्री आहे. एकाच परिवारामागे तो घुटमळत असतो. जरा कलानगरच्या पलीकडेही बघा, आम्हीही आहोत. एसटी डेपोकडे बघा. तेथील कर्मचाऱ्यांच्या पगाराकडे बघा. काही नाही. आज आमच्या चित्रा वाघ यांच्या वाहनामागे गाडी लावून पाठलाग केला जातो. आमदारांना धमक्या दिल्या जातात. हे प्रकार वाढले तर भाजपाचे कार्यकर्तेही उद्या कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतील. आम्हीही ३९ वर्षे मुंबईत आहोत. बाळासाहेबांची शिकवण आम्हालाही आहे. आले अंगावर तर शिंगावर घेण्याची ताकद आहे आमच्यात. हल्ली कोणी सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढला तर हे त्याचे जुने उकरून काढतात. या गोष्टी बंद करा. आम्हीही बऱ्याच गोष्टी उकरून काढू शकतो. मग सोनू निगमही निघेल. तेव्हा मग बोलू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

वर्षाताई, याचे ट्रेनिंग चालू करा

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर १२ साऊंड क्लिप वायरल झाल्या. १२ दिवस हे बिळात का होते? शक्तीप्रदर्शन कोणाला घाबरावयला केले? बंजारा समाजाचा फायदा घेण्याचा प्रयत्न कोणी चालविला? अशामुळे यांची हिम्मत वाढते. गेल्या एक-दीड वर्षांत येथे एक कवच तयार झाले आहे. एकमेकांना सांभाळून घेण्याचे काम केले जात आहे. एका शेतकऱ्याने आत्महत्त्या करताना मुख्यमंत्र्यांचे नाव चिठ्ठीत लिहिले. गुन्हा दाखल झाला का? पूजा चव्हाणच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला का? आठ फेब्रुवारी २०२० रोजी दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू झाला. ती ज्या पार्टीत होती ती कोणी आयोजित केली होती? तिचा होणारा पती रोहन रॉय, तिचे आई-वडिल कोठे गायब झाले, पत्ता नाही. हे कसे गायब करायचे याचे ट्रेनिंग बहुदा यांना मिळाले आहे. वर्षा गायकवाड यांना विनंती आहे की, या ट्रेनिंगचेही क्लासेस चालू करा. पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख टिकवायची असेल तर हे थांबले पाहिजे. नाहीतर या अत्याचाराविरूद्ध जनता रस्त्यावर उतरेल, असेही नितेश राणे म्हणाले. वनखात्याची जमीन लाटत त्यावर मुख्यमंत्र्यांचे कुटूंबच घरे बांधत असतील तर अपेक्षा कोणाकडून ठेवायची, असा सवालही त्यांनी केला.

कलानगरमध्ये फोन हॅकिंग

येथे सायबर गुन्हेही वाढले आहेत. कोण काय बोलते हे हॅक करण्यासाठी कलानगरमध्ये पथक बसवले गेले आहे. कोण काय बोलतो याची माहिती घेतली जात आहे. याचीही चौकशी करा, अशी मागणी राणे यांनी केली.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content