Homeचिट चॅटमराठी शाळा संस्थाचालकांची...

मराठी शाळा संस्थाचालकांची रविवारी ऑनलाईन बैठक

राज्यातील मराठी शाळा टिकवायच्या असतील व गुणवत्तापूर्ण करायच्या असतील तर आधी त्या चालवणाऱ्या संस्थाचालकांच्या अडचणी काय आहेत व त्यातून कसा मार्ग काढायचा याचा विचार करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. त्यासाठी मराठी अभ्यास केंद्राने अलीकडेच मराठी शाळा संस्थाचालक संघ ह्या कार्यगटाची स्थापना केली आहे. महाराष्ट्रातील समविचारी मराठी शाळांच्या संस्थाचालकांना सोबत घेऊन मराठी शाळा संस्थाचालक संघाचे काम जोमाने पुढे नेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून मुंबई व पालघर जिल्ह्यातील मराठी शाळांच्या संस्थाचालकांची दुसरी बैठक येत्या ७ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडणार आहे.

आज मराठी शाळांच्या संस्थाचालकांना शाळा चालवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. “मराठी शाळांचे प्रश्न व संस्थाचालकांची भूमिका” हा बैठकीचा मुख्य विषय असून मराठी शाळांच्या संस्थाचालकांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आर्थिक, प्रशासकीय व शैक्षणिक प्रश्नांवर तसेच इतर अडचणींवर बैठकीत विचारमंथन करण्यात येणार आहे.

ही दुसरी बैठक असून यानंतर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्याही बैठका पार पडणार आहेत. मराठी अभ्यास केंद्र संलग्न, मराठी शाळा संस्थाचालक संघाच्या माध्यमातून मराठी शाळांच्या संस्थाचालकांना या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी https://marathiabhyaskendra.org.in/schools या दुव्यावर जाऊन नाव नोंदवून बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी निमंत्रक सुशील शेजुळे यांच्याशी ९६०४५२३६६६, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मराठी अभ्यास केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content