Homeमाय व्हॉईसठाणे रेल्वेस्थानक परिसराला...

ठाणे रेल्वेस्थानक परिसराला महाव्यवस्थापकांची २० वर्षांत भेटच नाही!

गेल्या १५/२० वर्षात ठाणे रेल्वेस्थानकाचा बराच विस्तार झाला. फलाटही वाढले तसेच लोकल आणि इतर गाड्यांची संख्याही वाढली हे मान्य केलेच पाहिजे. या प्रमाणात स्थानक परिसरातील सोयीसुविधा मात्र कासव गतीने वाढत आहेत. याविरूध्द ठाणेकरांच्या मनात रोष आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वगळता ठाणे रेल्वेस्थानकाकडून प्रचंड प्रमाणात महसूल रेल्वेला पर्यायाने केंद्र सरकारला मिळत असूनही या स्थानकाचे स्वरूप गलिच्छ आणि ओंगळवाणेच राहिलेले आहे.

प्रचंड गर्दी हे परिसराचे खरे दुखणे आहे. त्यातच हल्ली या परिसराला भिकारी आणि बेवारस लोकांनी जणू गराडाच घातलेला दिसत आहे. भिकाऱ्यांचे नंदनवन असल्यासारखीच परिस्थिती आहे. अगदी रिक्षा थांब्याच्या जागेपासून भिकारी दर्शन देत असतात. जे दर्शन देत नाहीत ते थांब्याच्या मागे अस्ताव्यस्त पडलेले असतात. नाशिक टॅक्सी थांब्याच्या टपरीवर चक्क एक भिकारी पहुडलेली दिसत आहे तसेच आतील फलाट क्रमांक एकवर बसण्याच्या जागेवर चक्क एका प्रवाशाने झोप काढायची ठरवल्याचे दिसत आहे. रेल्वे पोलिस व्हॅनशेजारीच एक बेवारस झोपलेला दिसत आहे. त्या रिक्षा थांब्याची ही दुर्दशा झालेली आहे. आतील बाजूच्या अनेक लाद्या उखडून गेलेल्या आहेत तर तेथे असलेला एक आधार खांब ‘स्वच्छतेचा’ पुरस्कार आपल्याला कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहे. या परिसरातील रस्त्यांबांबत काय बोलावे? समतल म्हणजे काय हे त्या अभियंत्याला जणू माहीतच नसावे असे खेदाने म्हणावे लागत आहे.

महाव्यवस्थापकांच्या भेटीबाबत एक किस्सा समजला. गेल्या सुमारे २० वर्षात एकाही महव्यवस्थापकाने या स्थानक परिसराची एकदाही पाहणी केलेली नाही. एक अधिकारी म्हणाला की, महाव्यवस्थापकांना कर्जत/लोणावळा येथे जायचे असेल तेव्हाच फक्त ते स्थानकाची बसल्या जागीच फ्लायिंग पाहणी करतात. ठाणे, कल्याण परिसरातील एकाही खासदाराला याबाबत प्रश्न विचारावासा वाटत नाही. यातच रेल्वेकडून ठाण्याचा अपमान का होतो याचे कारण दडले असल्याचे एका ज्येष्ठ प्रवाशाने सांगितले. ठाणे रेल्वेस्थानक परिसराची अशीच दुरवस्था कायम राहिली तर कधीतरी प्रवाशांचा संताप अनावर होईल हे मात्र निश्चित!

Continue reading

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...

‘एशियाटीक’ची निवडणूक जूनमध्ये तरी होणार? दोन्ही बाजूंच्या सदस्यांत घुसखोर!

मुंबईतल्या एशियाटीक लायब्ररी, या प्रतिष्ठित संस्थेची निवडणूक 'घुसखोर' सदस्यांशिवाय जून महिन्यात घेण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असला तरी ती जूनमध्येच होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण नव्याने निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीची मुदत केवळ सप्टेंबर...

ठाणे पालिकेच्या बेसमेंटमध्ये आहे ५० घमेली धूळ!

ठाणे शहरात संपूर्ण लोकमान्य नगर अगदी जुन्या बस डेपोपासून तो नव्या बस डेपोपर्यंत फेरफटका मारला असता रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या दुचाक्या व रिक्षा यांना चकवत नागरिक कसे चालत असतील याचा विचारच न केलेला बरा. लोकमान्य नगरात तर एका ठिकाणी...
Skip to content