Homeटॉप स्टोरीपिता-पुत्राच्या कोठडी मृत्यूप्रकरणी...

पिता-पुत्राच्या कोठडी मृत्यूप्रकरणी ९ पोलिसांना फाशीची शिक्षा!

देशाला हादरवून सोडणाऱ्या तमिळनाडूतील ‘जयराज आणि फेनिक्स’ कोठडी मृत्यू प्रकरणात मदुराई येथील विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणी दोषी ठरलेल्या नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कायद्याचे रक्षकच जेव्हा अमानुष भक्षक बनतात, तेव्हा त्यांना कठोरतम शिक्षा मिळणे गरजेचे आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला.

हे हृदयद्रावक प्रकरण जून २०२०मधील आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात सात्तानकुलम पोलिसांनी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स (फेनिक्स) यांना रात्री उशिरापर्यंत दुकान उघडे ठेवल्याच्या क्षुल्लक कारणावरून ताब्यात घेतले होते. कोठडीत असताना या पिता-पुत्राला पोलिसांनी अत्यंत क्रूर आणि अमानवीय पद्धतीने मारहाण केली होती. या अमानुष छळामुळे गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते आणि ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’च्या धर्तीवर भारतात ‘जस्टिस फॉर जयराज-फेनिक्स’ ही मोहीम सोशल मीडियावर जोरात चालली होती.

या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला असून, तपासादरम्यान पोलिसांनी केलेले अत्याचार आणि पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न न्यायालयात सिद्ध झाले. सीबीआयने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबानीवरून न्यायालयाने या नऊ पोलिसांना हत्त्येच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले. कोठडीतील मृत्यू (कस्टोडियल डेथ) प्रकरणात एकाचवेळी नऊ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्याची ही देशातील दुर्मिळ घटना मानली जात आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला पाच वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर न्याय मिळाला असून, यामुळे पोलिसांच्या मनमानी कारभाराला मोठा चाप बसण्याची शक्यता आहे.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content