Homeटॉप स्टोरीराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात ४ टक्के वाढ

महाराष्ट्रातल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांच्या थकबाकीसह महागाईभत्त्यात ४ टक्के वाढ याच महिन्याच्या म्हणजेच जुलैच्या वेतनापासून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने या मागणीसह राज्य शासनातील सर्वांना जुनी पेन्शन लागू करणे तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या इतर महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठपुरावा केला होता. याच विषयांवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १० जून २०२४ रोजी बैठक झाली होती. त्यानंतर याच विषयावर २८ जून २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अधिकारी महासंघाची बैठक झाली. या बैठकांमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकांत केंद्र सरकारप्रमाणे १ जानेवारी २०२४पासून ४% महागाईभत्ता वाढ थकबाकीसह मंजूर करण्याची आग्रही मागणी अधिकारी महासंघ पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यावर सत्वर कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले होते. त्यास अनुसरुन, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात १ जानेवारी २०२४पासून ४% वाढ करण्याचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला. ही वाढ जानेवारी ते जून २०२४ या सहा महिन्यांच्या थकबाकीसह जुलै महिन्याच्या वेतनात रोखीने मिळणार आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयाचे अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणिस समीर भाटकर, तसेच कोषाध्यक्ष नितीन काळे यांनी स्वागत केले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content