Homeटॉप स्टोरीराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात ४ टक्के वाढ

महाराष्ट्रातल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांच्या थकबाकीसह महागाईभत्त्यात ४ टक्के वाढ याच महिन्याच्या म्हणजेच जुलैच्या वेतनापासून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने या मागणीसह राज्य शासनातील सर्वांना जुनी पेन्शन लागू करणे तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या इतर महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठपुरावा केला होता. याच विषयांवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १० जून २०२४ रोजी बैठक झाली होती. त्यानंतर याच विषयावर २८ जून २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अधिकारी महासंघाची बैठक झाली. या बैठकांमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकांत केंद्र सरकारप्रमाणे १ जानेवारी २०२४पासून ४% महागाईभत्ता वाढ थकबाकीसह मंजूर करण्याची आग्रही मागणी अधिकारी महासंघ पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यावर सत्वर कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले होते. त्यास अनुसरुन, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात १ जानेवारी २०२४पासून ४% वाढ करण्याचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला. ही वाढ जानेवारी ते जून २०२४ या सहा महिन्यांच्या थकबाकीसह जुलै महिन्याच्या वेतनात रोखीने मिळणार आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयाचे अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणिस समीर भाटकर, तसेच कोषाध्यक्ष नितीन काळे यांनी स्वागत केले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी सीरियाच्या दमास्कस दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीकरीता निघाल्यानंतर ते उतरलेल्या हॉटेलच्या जवळ दोन बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट मॅक्रॉन यांच्यावरील अयशस्वी हल्ला असल्याचे मानले जात आहे. असद राजवट पडल्यानंतर सीरियाला भेट देणारे...

वाहू लागला मुंबईकरांची तहान भागवणारा पहिला तलाव!

मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि मुंबईतच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक पालिकेचा ‘विहार’ तलाव आज, ७ जुलैला रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे‌. हा तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्टला पूर्ण भरुन वाहू लागला होता. सन १८५९मध्ये...
Skip to content