Homeहेल्थ इज वेल्थराज्यात आज ३५...

राज्यात आज ३५ हजारांना कोरोनाची लस!

राज्यात आज ४७७ केंद्रांवर ३५ हजार ८१६ (७४ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज धुळे जिल्ह्यात सर्वात जास्त १४४ टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ वर्धा, भंडारा, उस्मानाबाद, सातारा या जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले. आजपासून लसीकरण सत्राला सुरूवात झाली. उद्या मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण सत्र होईल. ३१ जानेवारीला पोलिओ लसीकरण असल्याने ३० जानेवारीचे कोरोना लसीकरण सत्र होणार नाही.

आज सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरु होते त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो. राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३५ हजार ७०१ जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात आज २६५ जणांना कोवॅक्सीन लस देण्यात आली आहे.

आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात दैनंदिन लसीकरण झालेले कर्मचारी, टक्के आणि आतापर्यंतची एकूण संख्या): 

अकोला (327, 65 टक्के, 1433), अमरावती (857, 86 टक्के, 3243), बुलढाणा (804, 80 टक्के, 2921), वाशीम (442, 88 टक्के, 1573), यवतमाळ (355, 71 टक्के, 2143), औरंगाबाद (816, 48 टक्के, 3959), हिंगोली (237, 79 टक्के, 1573), जालना (760, 95 टक्के, 2445), परभणी (275, 55 टक्के, 1597), कोल्हापूर (1097, 55 टक्के, 4601), रत्नागिरी (487, 52 टक्के, 1942), सांगली (1326, 78 टक्के, 4065), सिंधुदूर्ग (354, 59 टक्के, 1264), बीड (746, 83 टक्के, 3008), लातूर (974, 75 टक्के, 3081), नांदेड (385, 43 टक्के, 2062), उस्मानाबाद (319, 106 टक्के, 1620), मुंबई (1858, 64 टक्के, 6624), मुंबई उपनगर (3147, 93 टक्के, 10540), भंडारा (565, 113 टक्के, 1803), चंद्रपूर (392, 65 टक्के, 2569), गडचिरोली (645, 92 टक्के, 2215), गोंदिया (530, 88 टक्के, 1797), नागपूर (1344, 61 टक्के, 6111), वर्धा (1315, 120 टक्के, 3960), अहमदनगर (1334, 64 टक्के, 5240), धुळे (864, 144 टक्के, 2755), जळगाव (867, 67 टक्के, 3437), नंदुरबार (347, 50 टक्के, 1822), नाशिक (1517, 66 टक्के, 5991), पुणे (2903, 65 टक्के, 11,188), सातारा (1419, 101 टक्के, 4891), सोलापूर (967. 51 टक्के, 5570), पालघर (1016, 85 टक्के, 2606 ), ठाणे (3904, 95 टक्के, 13,109), रायगड (321, 40 टक्के, 1303).

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content