Homeएनसर्कलपश्चिम घाट परिसरातल्या...

पश्चिम घाट परिसरातल्या बुरशीजन्य मातीत २ नव्या प्रजाती!

भारतीय शास्त्रज्ञांनी एस्परगिलस सेक्शन निग्रीमधील लपलेल्या विविधतेचा नुकताच उलगडा केला आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पुण्यातल्या एमएसीएस-अघारकर, या स्वायत्त संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी  एस्परगिलस सेक्शन निग्री (सामान्यतः ब्लॅक एस्परगिलस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) दोन नवीन प्रजातींविषयी संशोधन केले आहे. एस्परगिलस-ढाकेफलकरी आणि एस्परगिलस-पॅट्रिसियाविल्टशारीया म्हणून त्या ओळखल्या गेल्या आहेत. घनदाट वृक्षराजी असलेल्या पश्चिम घाट पट्ट्यातून गोळा करण्यात आलेल्या मातीच्या नमुन्यांमधून दोन काळ्या एस्परगिलिस ए. अ‍ॅक्युलेटीनस आणि ए. ब्रुनिओव्हायोलेसियसची पहिली भौगोलिक नोंद केली गेली आहे. या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील जागेचा सतत शोध आणि संवर्धन करण्याची गंभीर गरज या निष्कर्षांवरून अधोरेखित झाली आहे.

पश्चिम घाटातील निग्री सेक्शनमधील एस्परगिलसमधील नवीन प्रजातींचे पूर्वीचे शोध परदेशातील संशोधकांनी लावले असले तरी, हा अभ्यास मूळतः डॉ. राजेश कुमार के. सी. यांनी राष्ट्रीय बुरशीजन्य संस्कृती संग्रह, पुणे येथील अघारकर संशोधन संस्‍थेत (एआरआय) केला. हे शोधकार्य येथे एएनआरएफ (पूर्वीचे एसईआरबी) प्रकल्पाचा भाग म्हणून सुरू केले होते आणि एमएसीएस-एआरआय मुख्य निधीच्या मदतीने पुढे चालू ठेवला होता. हे काम पश्चिम घाट भागात आढळणाऱ्या  मायक्रोलॉजिकल म्हणजेच बुरशीविषयीच्‍या अभ्‍यासामध्‍ये तसेच समजुतीमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते. त्याचबरोबर बुरशीजन्य विविधतेचा मोठ्या प्रमाणात वापर न केलेला जलाशय म्हणून या प्रदेशाची स्थिती अद्वितीय आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण म्हणून अधोरेखित करते. भारतातील सर्वात प्रगत एकात्मिक किंवा ‘पॉलीफेसिक’  म्हणजेच बहुचरणीय वर्गीकरण पद्धतींचा वापर करून भारतीय पथकाने केलेला एस्परगिलसचा हा पहिलाच अभ्यास आहे.

Continue reading

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...

‘महिला आरक्षण’ हे जातीनिहाय जनगणनेला बगल देण्याचे षडयंत्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षणाचा वापर केवळ जातीनिहाय जनगणना लांबणीवर टाकण्यासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. आरक्षणाच्या नावाखाली सरकार मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष भरकटवत असल्याची टीका त्यांनी केली. सोनिया गांधी यांच्या मते, सरकारला देशातील...

जगातल्या १० सर्वात उष्ण शहरांत अकोला दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्र सध्या उन्हाच्या भीषण तडाख्याने होरपळून निघत असून, विदर्भातील तापमानाने जागतिक विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. 'एल डोराडो वेदर' आणि हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील १० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील तब्बल ४ शहरांचा समावेश झाला आहे. यात अकोला...
Skip to content