Homeपब्लिक फिगरयुवकांना अजिंठा परिसरातल्या...

युवकांना अजिंठा परिसरातल्या भू-वारसा स्थळांची माहिती हवी!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज अजिंठा येथे भू-वारसा शिबिराचे आयोजन केले होते. आपल्या परिसरातील भू-वारसा स्थळांची माहिती युवावर्गाला व्हावी त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे देशभर आयोजन करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 मध्ये विकसित भारताचे ध्येय दिले आहे. ते आपणा सर्वांना पूर्ण करायचे आहे. त्यादृष्टीने युवकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असे रावसाहेब पाटील दानवे म्हणाले. अशाप्रकारची माहिती विद्यार्थ्यांना आयुष्यभर मोलाची ठरणारी असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वारसा स्थळांची सहल घडवून आणावी, असे आवाहन मंत्र्यांनी केले.

देशात प्रथमच विकसित भारताचे ध्येय पूर्ण करण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद करुन ठेवली आहे. भारताचा विकासाचा वेग पाहून जग भारताकडे आकर्षित होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे वाढते महत्त्व हे भारताची विकसित देशाकडे असलेली वाटचाल दर्शवते, असे ते म्हणाले. 

पुढे बोलताना राज्यमंत्री दानवे म्हणाले की, दळणवळणाची साधने आणि संपर्कव्यवस्था वाढल्याने विकासाला चालना मिळते. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परिसरात रेल्वेमार्गाच्या विकासाचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी भू-वारसा स्थळांसंबंधी आयोजित करण्यात आलेल्या विविध प्रश्नमंजूषेतील विद्यार्थ्यांना पारितोषकं प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, खाण मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार शकील आलम, भारतीय भू-वैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेचे अधिकारी उपस्थित होते. 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content