Homeबॅक पेजस्पोर्टिंग युनियन, युरोपेम...

स्पोर्टिंग युनियन, युरोपेम यांची विजयी सुरुवात

भावना सानप (९८) हिच्या दमदार खेळीच्या बळावर यजमान स्पोर्टिंग युनियनने चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये माटुंगा जिमखान्याचा १११ धावांनी दणदणीत पराभव करुन विजयी सुरुवात केली. यजमानांनी २० षटकांत ५ बाद १८९ धावा केल्या. आज “अ” गटातील दुसऱ्या लढतीत युरोपेमने ओरिएंटल सी. सी.चा १६ धावांनी पराभव केला. सलामीच्या रिया पवारने ५८ चेंडूंमध्ये ८१ धावा फटकावल्याने युरोपेमला ४ बाद १६८ धावा करता आल्या. उत्तरादाखल ओरिएंटलने ६ बाद १५२ धावा केल्या.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित या स्पर्धेला कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेम यांचे सहाय्य मिळाले आहे. भावना आणि रिया यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भावनाचे शतक जरी हुकले असले तरी तिने ६५ चेंडूत ९८ धावा फटकाविताना १६ चौकार आणि १ षटकार अशी आतषबाजी केली. स्पोर्टिंग युनियनच्या अंकिता पवार (२९) हिची भावना बरोबरची तिसऱ्या विकेटसाठी केलेली ९८ धावांची भागी महत्त्वाची ठरली. त्याआधी स्पोर्टिंग युनियनची २ बाद ३ धावा अशी खराब स्थिती होती. भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडू संगीता डबीर, सुनिता कनोजिया-सिंग यांच्या हस्ते स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. 

संक्षिप्त धावफलक

स्पोर्टिंग युनियन- २० षटकात ५ बाद १८९ (भावना सानप ९८), अंकिता पवार (२९), दिव्या चलवाड (२०/२), वि. वि. माटुंगा जिमखाना १४.२ षटकात सर्व बाद ७८ (अनिषा कांबळे ३७, त्वचा शेट्टी ९/२, रेणिता गोरया १३/२),  सामनावीर- भावना सानप

युरोपेम- २० षटकात ४ बाद १६८ (रिया पवार ८१) वि. वि. ओरिएंटल सी. सी. २० षटकात ६ बाद १५२ (निधी कोल्हे २५, सानिया जोशी ३४, सिद्धी कामटे २७, आर्या लोखंडे २९/४), सामनावीर- रिया पवार

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content