Homeन्यूज अँड व्ह्यूज'महानंदा'च्या जागेवर उभे...

‘महानंदा’च्या जागेवर उभे राहणार टोलेजंग टॉवर?

मुंबईत गोरेगावच्या (पू) आरे कॉलनीला लागूनच महानंदा दुग्ध प्रकल्पाचे मुख्य कार्यालय व दूध डेअरी आहे. गेली अनेकवर्षे या आवारात असलेल्या दूध केंद्रावरून महानंदाची विविध दुग्धउत्पादने मिळत आहेत. दूधही तेथे मिळते. गोरेगाव (पू) नागरी वस्तीही वाढली असून सकाळी फेरफटका मारायला जाणारी मंडळी या केंद्रातूनच दूध घेऊन जाणे पसंत करतात. कारण बाहेरच्या कुणाला दूध घरी टाकायला सांगितले तर ती व्यक्ती दरपिशवीमागे किमान एक ते दीड रुपया जास्त चार्ज करते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या मुख्य प्रकल्पातून घेतलेले दूध नासत असल्याच्या (खराब होते) नागरिकांच्या तक्रारी आहेत. दूध नासल्याची तक्रार घेऊन केंद्रावर गेले असता नेहमीप्रमाणे केंद्रचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर गिऱ्हाईकाने कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचे सांगितल्यानंतर तो केंद्रचालक वरमला व त्याने दूध बदलून दिले.

योगायोगाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हे दूधकेंद्र परप्रांतीयाने चालवायला घेतल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर महानंदामध्ये टप्प्याटप्प्याने VRS / स्वेच्छानिवृत्ती देण्यात येत असल्याने कर्मचारी-कामगारवर्गात असंतोष आहे. त्यातच राज्यातल्या एका बड्या नेत्याने आपल्या अनुयायांना महानंदाचा कामगार वा कपातीचा प्रश्न माझ्याकडे आणू नका असे सूचित केल्याने कामगार हतबल झाले आहेत. संतापाची बाब म्हणजे कोणतीच कामगार संघटना याप्रकरणी आवाज उठवण्यास राजी नाही. येत्या एक-दोन वर्षात हा दुग्धप्रकल्प हळूहळू बंद पाडून त्याजागी टोलेजंग टॉवर्स उभे राहिले तर आश्चर्य वाटायला नको असे तेथील नागरिकांनी सांगितले.

छायाचित्र मांडणीः सोनाली वऱ्हाडे

Continue reading

भाईंदरमध्ये पोलिसांच्या कार्यक्रमात ताकाचा ग्लास आणि …

वाचक हो, तुम्हाला आठवत असेलच की जुन्या हिंदी चित्रपटात अर्ध्या नोटेचं चिटोरं दाखवलं की खलनायकाच्या गुहेत विनासायास प्रवेश मिळत असे. (हल्ली काही वेबसिरीजमध्येही हा खेळ दाखवत असतात) तसेच लाचलूचपत प्रतिबंधक खात्यातर्फे धाड पडली की काहीजण नोटा खातात. काहीजण संडासाच्या...

न्यायालयात शब्दांना धार, बोरूही चालतो.. पण हातचं राखून!

ठाणे शहरात नुकतेच शहरातील 'वाहतूक लोककेंद्री कशी असावी' यावर एक चर्चासत्र होते. या सत्रात दिगज्ज वक्ते होते. सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्या. अभय ओक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, अ. पा. देशपांडे व नगर रचनाकार सुलक्षणा महाजन आदी तगडे वक्ते होते....

न्यायमूर्तींचे निरीक्षण मोदी सरकारच्या अंगाशी!

अखेर अडीच-तीन महिन्यांच्या घोळानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलाच! त्यासाठी विद्यार्थ्यांना जंतरमंतरवर चार दिवस आंदोलन करावे लागले, लाठीमर खावा लागला. अनेक विद्यार्थ्यांना तर दिल्ली पोलिसांनी बदडून काढलेले जनतेने पाहिले. (विद्यार्थ्यांनीही पोलिसांना मारले...
Skip to content