Homeकल्चर +विद्रोही साहित्य संमेलनाला...

विद्रोही साहित्य संमेलनाला ग्रेटा थनबर्ग?

महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये यंदा ९४वे अखिल भारतीय साहित्य संमेलन येत्या २५ ते २८ मार्चदरम्यान होणार असून याचदरम्यान नाशिकमध्येच १५वे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीकडून आयोजित या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी शेतकरी आंदोलनाला ट्विटरवरून पाठिंबा देणाऱ्या वादग्रस्त आंतरराष्ट्रीय पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांना निमंत्रित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे समजते.

मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजकांची पत्रकार परिषद झाली. त्यात विद्रोहीच्या अध्यक्षा प्रा. प्रतीमा परदेशी यांनी १५व्या संमेलनाची घोषणा केली. २५ आणि २६ मार्चला नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या केटीएमएच महाविद्यालयाच्या आवारात संमेलन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समीक्षक डॉ. आनंद पाटील (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली आहे. पाटील आघाडीचे सांस्कृतिक तुलनाकार व इतिहासकार आहेत. निर्भीड मांडणी आणि आंतरविद्याशाखीय व्यासंगासाठी ते ओळखले जातात. कागूद आणि सावली, या त्यांच्या दोन लघु कांदबऱ्या गाजल्या आहेत. गोवा, नवी दिल्ली आणि उत्तर गुजरात विद्यापीठात ते प्राध्यापक होते. त्यांची २४पेक्षा अधिक ग्रंथसंपदा प्रकाशित झाल्याचे विद्रोहीचे राज्य संघटक कॉ. किशोर ढमाले यांनी सांगितले.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाला राज्य सरकार देत असलेले ५० लाख रूपयांचे अनुदान रद्द करावे, अशी मागणी विद्रोही संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशी उन्हवणे यांनी यावेळी केली. मूठभर धान्य आणि एक रुपया अशी वर्गणी घेऊन हे संमेलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाचे सर्व नियम पाळून संमेलन घेणार असल्याचे विद्रोहीचे विश्वस्त गणेशभाई उन्हवणे म्हणाले. दिल्लीत चालू असलेले शेतकरी आंदोलन आणि केंद्रातल्या मोदी सरकारकडून होत असलेली अभिव्यक्तीची गळचेपी, या पार्श्वभूमीवर नाशिक येथे हे १५वे विद्रोही साहित्य संमेलन होत आहे, असे राजू देसले म्हणाले.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content