Homeपब्लिक फिगरअंधेरीतील कामगार हॉस्पिटल...

अंधेरीतील कामगार हॉस्पिटल ६ महिन्यांत सुरू होणार?

मुंबईतल्या अंधेरी येथील अद्ययावत कामगार हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाणार नाही. पुढील तीन महिन्यांत रूग्णालयाचा बाह्यरूग्ण विभाग (ओपीडी) सुरू करू व सहा महिन्यांत पूर्ण हॉस्पिटल सुरू केले जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी दिली आहे.

कामगारांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या अंधेरीतील कामगार हॉस्पिटलप्रश्नी राजेश शर्मा यांनी आवाज उठवला होता. हे हॉस्पिटल उद्योगपतींच्या घशात घालू नका व एका महिन्यात हॉस्पिटल सुरू करा, अन्यथा तीव्र लढा दिला जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता. याची केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी तत्काळ दखल घेऊन आज एका बैठकीचे आयोजन केले होते. यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या सचिव आरती आहुजा यांनी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निर्देशानुसार बैठक घेतली. या बैठकीत ESICचे डायरेक्टर जनरल डॉ. राजेंद्र कुमार, राज्य सरकार व केंद्र सरकारचे उच्च अधिकारी, राजेश शर्मा व काँग्रेसच्या उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष क्लाईव्ह डायस उपस्थित होते.

काही तांत्रिक अडचणीमुळे हॉस्पिटल सुरू होण्यास विलंब होत आहे. परंतु यातून लवकरच मार्ग काढून पुढील तीन महिन्यात OPD विभाग सुरू करु व सहा महिन्यांत हॉस्पिटलच्या सर्व सेवा सुरू केल्या जातील, असे आश्वासन या बैठकीत देण्यात आले.

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या या हॉस्पिटलमध्ये ५०० बेड्स व मेडिकल कॉलेज होते. या रुग्णलयात OPD, IPD (350 बेड्स), ICU आणि सुपर स्पेशालिटी सुविधा २४ तास सुरू होत्या. पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, एक्स-रे, सीटी-एमआरआय, ऑपरेशन थिएटरसह सर्व सोयीसुविधांनी हे रुग्णालय सुसज्ज होते. OPD विभागात दररोज १८०० ते २००० रुग्ण भेट देत होते. ब्लड बँकेची सुविधाही उपलब्ध होती. महाराष्ट्रातील अनेक शहरातील कामगार अंधेरीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत होते. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात होत्या. परंतु १७ फेब्रुवारी २०१८ रोजी या रुग्णालयात आगीची दुर्घटना घडून १३ जणांचा मृत्यू झाला व १५० जण जखमी झाले. तेव्हापासून हे रुग्णालय बंद आहे. अंधेरीतील हे हॉस्पिटल लवकर सुरू करावे अशी कामगारांची मागणी आहे. सरकारने आता आश्वासन दिले असले तरी हे हॉस्पिटल सुरू होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहिल, असे राजेश शर्मा म्हणाले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content