Homeएनसर्कलपदोन्नतीतल्या आरक्षणावर कोण...

पदोन्नतीतल्या आरक्षणावर कोण नमते घेणार?

पदोन्नतीतले आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या उपसमितीच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. सत्तेतल्या काँग्रेसने या निर्णयाला ठाम विरोध केला असून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे या विषयावर नेमके कोण माघार घेणार आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने सात मे रोजी शासननिर्णय जारी करून पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले होते. काँग्रेसचे नेते डॉ. नितीन राऊत यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस, हा निर्णय मागे घ्यायला सरकारला भाग पाडेल, असे जाहीर केले. राज्य मंत्रिमंडळातही राऊत यांनी हा विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे त्यांना बोलूच देण्यात आले नाही.

पदोन्नती

त्यावेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक झाली. त्यात नितीन राऊत, वर्षा गायकवाड आदी मंत्री सहभागी झाले होते. मात्र, सुमारे तासभर झालेल्या या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी यातून मार्ग काढला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीनंतर नवाब मलिक तसेच छगन भुजबळ या मंत्र्यांनीही पदोन्नतीतील आरक्षणाच्या विषयावर मार्ग काढला जाईल, असे सांगितले.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content