Homeन्यूज अँड व्ह्यूजजम्मू-काश्मीरमध्ये काय करताहेत...

जम्मू-काश्मीरमध्ये काय करताहेत अमेरिकेचे राजदूत?

अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर जम्मू-काश्मीरमध्ये काय करत आहेत? ही एखाद्या गंभीर, घातक आणि भारतविरोधी कारवाईची सुरुवात तर नाही ना? यापूर्वी मार्को रुबिओ कोलकात्यात आले होते, तेव्हा कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) निदर्शनांचा आणि FCRAविरोधी आवाजांचा अमेरिकेतूनही सूर ऐकू आला होता. आधी अमेरिकन नागरिकांना भारतातून बाहेर पडण्याचा सल्ला देणारी प्रवासविषयक सूचना जारी होते आणि त्यानंतर भारतविरोधी कारवाई सुरू होते. आता हे सर्व काही अधिकच पूर्वनियोजित आणि अंदाज बांधता येण्यासारखे वाटत आहे. त्यामुळेच सर्जिओ गोर यांचे जम्मू-काश्मीरमधल्या वावरण्याच्या भूमिकेबद्दल शंका निर्माण होत आहे.

अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी जम्मू-काश्मीर हा भारताचा महत्त्वाचा भाग असल्याचे विधान केले आणि त्यावर सर्वजण मोठ्या उत्साहाने प्रतिक्रिया देत आहेत. काही टीव्ही वृत्तवाहिन्या तर याला पाकिस्तानला लगावलेली जोरदार चपराक म्हणून सादर करत आहेत. पण जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यासाठी आपल्याला अमेरिकेच्या मान्यतेची गरज का आहे? भारताची भूमिका स्पष्ट आणि वाटाघाटीच्यापलीकडची आहे. या विषयात कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीचा प्रश्नच नाही, हे आपण स्पष्टपणे सांगितले आहे. सर्जिओ गोर यांनी

पाकिस्तानला पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (PoJK), बलुचिस्तान आणि गिलगिट-बाल्टिस्तान भारताकडे सोपवण्यास सांगितले असते, तर त्यांच्या विधानाला निश्चितच अर्थ प्राप्त झाला असता. आधी भारताची स्तुती करून त्याला खूश करायचे आणि नंतर पाकिस्तानला शांत करण्यासाठी त्याला शस्त्रे आणि आर्थिक मदत देऊन भारताची फसवणूक करायची, असा हा डाव असू शकतो.

जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना अमेरिकेसोबत थेट राजनैतिक संबंध प्रस्थापित करायचे आहेत. केंद्र सरकार आणि नायब राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असलेल्या केंद्रशासित प्रदेशातील राज्य सरकारला अमेरिकेसोबत थेट राजनैतिक संबंध प्रस्थापित करायचे आहेत. सर्जिओ गोर येथे आपला राजकीय खेळ खेळत आहेत. हे लोक केवळ सहज किंवा विनाकारण कुठेही जात नाहीत. ते भारताला पाकिस्तानविरुद्ध आणि ओमर अब्दुल्ला यांना केंद्र सरकारविरुद्ध उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा जम्मू-काश्मीर दौरा कोणत्याही अंतस्थ कारणाशिवाय झालेला नाही. त्यांनी दाखवलेला हा ‘सद्भावनेचा’ संकेत भारत सरकारला व्यापार कराराच्या मुद्द्यावर आपल्या बाजूने वळवण्याशी संबंधित असण्याचीही शक्यता आहे. हे लोक जसे दिसतात तसे प्रत्यक्षात नसतात. घातक राजकीय खेळी खेळण्यात आणि कुटिल डावपेच करण्यात ते अत्यंत निष्णात आहेत आणि असतात. त्यामुळे जरा जपूनच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

भारतात अमेरिकेची अनेक ‘टूलकिट’ एकाचवेळी कार्यरत!

नरेंद्र मोदी २०१४मध्ये भारताचे पंतप्रधान झाल्यापासून भारतात जे काही घडत आहे, त्याची प्रत्यक्ष तयारी फेब्रुवारी २००२च्याही खूप आधीपासूनच सुरू होती. हे सर्व कटकारस्थान, रणनीती, टूलकिट्स, कुकबुक्स, अहवाल, मनो-नियंत्रणाचे खेळ, अहिंसेचे शस्त्रीकरण आणि सत्ताव्यवस्था कमजोर करण्याच्या मोहिमा यांचे एकत्रित स्वरूप...

भाजपचा आयटी सेल बिनकामाचा? प्रभावी प्रवक्तेही गायब!

भाजप (भारतीय जनता पक्ष) आणि एकेकाळी प्रभावी, प्रसिद्ध असलेली त्यांचा आयटी सेल व संशोधन शाखा काँग्रेस आणि तिच्या डाव्या-उदारमतवादी (Left-Liberal) परिसंस्थेकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या कथानकांना (False Narratives) सुरुवातीलाच का रोखू शकत नाही? भाजपचा आयटी सेल आणि एकेकाळी प्रभावी, अभ्यासू...

राजकारणी आणि शिक्षण माफियांमधल्या साटेलोट्यामुळेच विद्यार्थ्यांचे वाटोळे!

सरकार जोपर्यंत राजकारणी आणि शिक्षण माफिया यांच्यातले साटेलोटे तोडण्याचे धाडस दाखवत नाही, तोपर्यंत नीट-युजी (NEET-UG)चा गोंधळ संपणार नाही. हे दोघे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे साटेलोटे आता घट्ट रुजले असून पालकांची आर्थिक लूट आणि विद्यार्थ्यांचा मानसिक छळ...
Skip to content