Homeकल्चर +आजही अजरामर आहेत...

आजही अजरामर आहेत पद्मश्री सुलोचना चव्हाण यांच्या लावण्या!

महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचं मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजेच १० डिसेंबर 2022 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. आज त्यांचा  पहिला स्मृतीदिन आहे.

‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा…’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना…’ यासारख्या एकाहून एक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या आवाजाच्या जादूने ठसकेबाज केल्या. गेल्या वर्षी त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. सुलोचना चव्हाण यांनी मराठीव्यतिरिक्त हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले आहेत. त्यांचे गझलगायन ऐकून बेगम अख्तर यांनी सुलोचना चव्हाण यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती.

सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी, आचार्य अत्रे यांच्या “हीच माझी लक्ष्मी” या चित्रपटात गायली. या लावणीचे संगीतकार वसंत देसाई होते, तर ही लावणी हंसा वाडकर यांच्यावर चित्रित झाली होती. या एका गाण्याने सुलोचना चव्हाणांच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लागले. सुलोचना यांनी स्वरबद्ध केलेल्या पहिल्या लावणीचे बोल “मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी…” असे होते. आचार्य अत्रे यांनीच सुलोचना चव्हाण यांना “लावणीसम्राज्ञी” हा किताब दिला होता. आजही आपल्या सर्वांच्या मनांमध्ये सुलोचनाबाई चव्हाण या अजरामर आहेत, अशा भावना त्यांची नात आरती चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content