Homeमुंबई स्पेशलवांद्रे-धारावी परिसरात गुरूवारी...

वांद्रे-धारावी परिसरात गुरूवारी पाणीपुरवठा विस्कळीत

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागातील धारावी नवरंग कम्पाउंड येथे २४०० मिलीमीटर व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी व ४५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी यांच्या जलजोडणीचे काम येत्या गुरुवारी, १८ एप्रिललला सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून ते शुक्रवारी, १९ एप्रिलला पहाटे ४ वाजेपर्यंत (एकूण १८ तासांसाठी) चालणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबईतल्या काही भागांत १०० टक्के तर काही भागांत २५ टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

याचा तपशील पुढीलप्रमाणे-

पूर्णपणे पाणीपुरवठा बंद असलेला भाग:

१. एच पूर्व विभाग- वांद्रे रेल्वे टर्मिनस व वांद्रे स्थानक परिसर (गुरुवार, १८ एप्रिल व शुक्रवार, १९ एप्रिल)

२. जी उत्तर– धारावी लूप मार्ग, नाईक नगर, प्रेम नगर (गुरुवार, १८ एप्रिलला धारावी येथील सकाळचा पाणीपुरवठा)

३. जी उत्तर– धारावी लूप मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, माहीम फाटक मार्ग (गुरुवार, १८ एप्रिलला धारावी येथील सायंकाळचा पाणीपुरवठा)

२५ टक्के पाणीपुरवठा बंद असलेला भाग:

१. जी उत्तर– ६०’ रोड, शीव-माहीम लिंक रोड, ९०’ रोड, महात्मा गांधी मार्ग, संत कक्कया मार्ग, ए. के. जी. नगर, एम. पी. नगर (गुरुवार, १८ एप्रिलला धारावी येथील सकाळचा पाणीपुरवठा)

तरी या भागांमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेद्वारे करण्यात आले आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content