Homeकल्चर +'जय जय स्वामी...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका स्वामी समर्थांच्या जीवनातील चमत्कारिक प्रसंग आणि त्यांची अध्यात्मिक लीला उलगडण्यावर आधारित आहे. मालिकेने प्रेक्षकांच्या मनात भक्ती आणि श्रद्धेचा विशेष ठसा उमटवला असून स्वामी समर्थांच्या कथांचा गूढ आणि चमत्कारिक भाग प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.

या आठवड्यात तुम्ही पाहू शकता की, साक्षात महादेवाचे अंश असलेले कर्नाटकच्या मुरगोड गावचे स्वामीभक्त चिदंबर दिक्षित अक्कलकोटमध्ये येऊन एक महायज्ञ आयोजित करतात. या यज्ञादरम्यान एका विचित्र स्थितीत मरण पावलेल्या ब्राह्मणाला स्वामी समर्थ एका विलक्षण अद्भुत लीलेने जिवंत करतात. या घटनेनंतर हा महायज्ञ कसा पूर्ण होतो याची विलक्षण भक्तिमय रंजक गोष्ट. ही मालिका नित्यप्रति जास्त लोकप्रिय होत चालली आहे. स्वामी समर्थांच्या भक्तांच्या आयुष्यातील या लीला भक्तांना नवी ऊर्जा आणि अपार श्रद्धा प्राप्त करून देत आहेत.

Continue reading

जि.प. निवडणुकीत आंबेडकर, जानकरांपाठोपाठ शेंडगेही काँग्रेसबरोबर

महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी तसेच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर आघाडी करणाऱ्या काँग्रेसने आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्त्वाखालील ओबीसी बहुजन आघाडीलाही बरोबर घेतले आहे. ही...

भाजपात निष्ठावंतांकडून उचल खाण्यास सुरूवात!

गेल्या काही वर्षांपासून पक्षवाढीच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीत (भाजपा) विविध पक्षांमधून होणाऱ्या इनकमिंगमुळे मूळच्या भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाला आता वाचा फुटू लागली आहे. पक्षवाढ करताना वेगवेगळ्या पक्षांमधून कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेलेच पाहिजेत. पण त्यामुळे वर्षानुवर्षे संधीच्या आशेवर कार्यरत...

महाराष्ट्रात थंडीची लाट हळूहळू ओसरणार!

या हंगामात हवामानाचा लहरीपणा सुरूच असून देशभरासह राज्याच्या काही भागात आता नव्याने थंडीचे पुनरागमन होत आहे. राज्यात सध्या हवामानाचे संमिश्र स्वरूप अनुभवायला मिळत आहे. पहाटे आणि रात्री जाणवणारा गारवा आणि दिवसा सूर्यप्रकाशामुळे जाणवणारा उकाडा, अशा दुहेरी वातावरणाने नागरिक काहीसे...
Skip to content