Homeएनसर्कल'वीरा'ने वाचवले नऊ...

‘वीरा’ने वाचवले नऊ मच्छिमारांचे प्राण

बोटीला आग लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या नऊ मच्छिमारांना आंध्र किनारपट्टीवर गस्तीवर असलेल्या भारतीय तटरक्षक जहाज “वीरा”ने तातडीने पाऊले उचलत नुकतेच वाचवले. 5 एप्रिल 2024 रोजी या बोटीला आग लागली होती. त्यानंतर या बोटीला जलसमाधी मिळाली होती.

आयसीजीएस वीराला विशाखापट्टणम बंदरापासून सुमारे 65 आणि नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या भारतीय मासेमारी नौका (आयएफबी) दुर्गा भवानीला आग लागल्याचा जवळच्या मासेमारी बोटीकडून रेडिओ संदेश मिळाला होता. आयएफबी दुर्गा भवानी ही आंध्र नोंदणीकृत बोट 26 मार्च 2024 रोजी काकीनाडा बंदरातून नऊ कर्मचाऱ्यांसह निघाली होती. 5  एप्रिलला बोटीला आग लागल्याने जहाजावरील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. सर्व नऊ मच्छिमारांनी जीव वाचण्यासाठी पाण्यात उडी मारली. परंतु काहींना गंभीर दुखापत झाली. स्फोटामुळे नुकसान झालेली मासेमारी बोट काही मिनिटांतच त्या ठिकाणी बुडाली. आग आणि स्फोटाची माहिती जवळच्या बोटीद्वारे तटरक्षक दलाच्या जहाजाला देण्यात आली.

परिस्थितीची निकड ओळखून आयसीजीएस वीरा वेगाने पुढे निघाले आणि वाचलेल्यांना मदत देण्यासाठी काही तासांतच त्या ठिकाणी पोहोचले. सर्व नऊ जणांना तटरक्षक दलाच्या जहाजात हलवण्यात आले तिथे वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर तातडीने प्रथमोपचार केले. दरम्यान, तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालय क्रमांक 6ने जेडी फिशरीज विशाखापट्टणम यांच्या समन्वयाने आयएफबीच्या गंभीर जखमी कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिकांची तातडीने व्यवस्था केली. सर्व जखमी मच्छिमारांना पुढील उपचारांसाठी विशाखापट्टणम येथील किंग जॉर्ज रुग्णालयात हलवण्यात आले.

आयसीजी जहाजाने दिलेल्या जलद प्रतिसादामुळे संपूर्ण बचाव मोहीम सहा तासांच्या अल्प कालावधीत पूर्ण झाली. भारतीय तटरक्षक दल ही समुद्रातील मच्छिमारांना मदत पुरवणारी प्रमुख संस्था आहे तसेच समुद्रात शोध आणि बचाव कार्यासाठीची राष्ट्रीय समन्वय संस्था आहे.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content