Homeपब्लिक फिगरवाझे प्रकरण लोकल...

वाझे प्रकरण लोकल तर परमबीरचे नॅशनल?

शिवसेनेशी संबंधित सचिन वाझेंचे प्रकरण लोकल लेव्हलचे असल्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही असे वक्तव्य करणाऱ्या शरद पवार यांना परमवीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचविण्यासाठी दिल्लीत राष्ट्रीय स्तरावर पत्रकार परिषदांचा सपाटा सुरू केल्याने त्यांना आता हे प्रकरण बहुतेक राष्ट्रीय पातळीचे वाटले असावे, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज लगावला.

मुंबईचे माजी पोलीस माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सातत्याने पाठराखण करणारे शरद पवार यांनी आता तरी महाराष्ट्राची बेअब्रू रोखावी व तत्काळ अनिल देशमुख यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

परमबीर सिंह यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी गोळा करण्याचे आरोप केल्यानंतर हे सर्व आरोप कसे चुकीचे आहेत, ते पत्रच खोटे आहे, पत्रावर शंका व्यक्त होत आहे व त्या पत्रातील नोंदीनुसार सचिन वाझे व गृहमंत्री देशमुख यांची भेटच झाली नसल्याचे तारखांचे दाखले पवार साहेबांनी तातडीने दिले. जर परमबीर सिंह यांनी ते पत्रच लिहिले नसते तर त्यांनी पोलीस सेवेत असतानाही गृहमंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराची सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल का केली असती याचे उत्तर शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

पुरावे नष्ट करण्याआधीच गृहमंत्री देशमुख यांच्याविरोधात खंडणी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशीची मागणी परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात केली असेल तर न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिकासुद्धा खोटी आहे का, असा सवालही चंद्रकात पाटील यांनी केला.

दोन दिवस होऊनही महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे काढणाऱ्या या गंभीर पत्राच्या चौकशीचे साधे आदेश अद्यापही महाविकास आघाडी सरकारने दिलेले नाहीत. विशेष म्हणजे परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमध्ये खुद्द शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. ज्याअर्थी पवार यांनी याबाबत कुठेही इन्कार केला नाही, त्याअर्थी या पत्रामध्ये तथ्य असल्याचे सिध्द होत आहे, मग सत्तेच्या लालसेपोटी पवार या प्रकरणात नक्की कोणाच्या कृष्णकृत्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत असा सवालही तयांनी केला.

Continue reading

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...

इराणकडून बाब-अल-मंदबची केली जाणार कोंडी?

अमेरिकेबरोबर कोणत्याही स्वरूपाची चर्चा करण्याची पाकिस्तानमार्फत करण्यात आलेली विनंती धुडकावून लावल्यानंतरही सध्याच्या युद्धविरामाला इराणबरोबरच्या पुढच्या चर्चेपर्यंत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात येत असल्याची घोषणा आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तसेच लष्करप्रमुख आसीफ मुनीर यांच्या आवाहनाला...

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...
Skip to content