Homeकल्चर +शोभा नाखरे यांची...

शोभा नाखरे यांची संजीवनी मराठे यांच्या साहित्यिक विश्वाला आदरांजली!

संजीवनी मराठे यांच्या कविता आणि गीते यांनी साहित्यक्षेत्रावर अधिराज्य केले. कवयित्री संजीवनी या नावाने काव्यलेखन करणाऱ्या संजीवनी मराठे या गीतरचना आणि काव्यगायन यासाठी मराठी साहित्य विश्वात ओळखल्या जातात. त्यांच्या साहित्यिक विश्वाचा आढावा घेणारे पुस्तक संजीवनी मराठे – व्यक्तित्व आणि कर्तृत्व या शीर्षकात प्रसिद्ध निवेदिका आणि साहित्यिक शोभा नाखरे यांनी लिहिले असून नवचैतन्य प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केले आहे.

काळाच्या पुढील विचार मनीमानसी रुजवत, काहीशा बंडखोर भूमिका घेत, आपल्या प्रेमाची रुजवात करून सूरशब्द पेरत, मनाच्या कलासक्त गाभाऱ्यात चिरंतन जपून अनेकांना संस्कारक्षम विचारांना मार्ग दाखविणाऱ्या संजीवनी मराठे यांना वाहिलेली ही आदरांजली असल्याचे लेखिकेने म्हटले आहे.

१९३२ साली कोल्हापूर येथील साहित्यसंमेलनातून त्यांचा काव्यक्षेत्रात प्रवेश झाला. त्यांच्यावर भा. रा. तांबे तसेच रवींद्रनाथ टागोरांच्या काव्याची मोहिनीही त्यांत्यावर होती. तांबे यांची जीवनसृष्टी, सौंदर्यशक्ती, तसेच शब्दकळा, आविष्कराचे वळण यांचा संजीवनींच्या कवितेवरील संस्कार स्पष्ट आहे. मनोरमा रानडे यांच्या काव्यातून आधुनिक सुशिक्षित, सुसंस्कृत स्त्रीमनाचा विशेषत: तिच्या प्रणयभावनेचा, जो एक सहजमोकळा आविष्कार घडण्यास प्रारंभ झाला होता, त्याची परंपराही संजीवनींच्या कवितेत पृथगात्य स्वरूपात प्रवाहित झालेली दिसते. प्रणयानुभवातील तरल स्पंदने, त्याची स्वप्‍निलता, अलौकिकता व्यक्त करणारी त्यांची कविता तिच्या अस्सलपणामुळे व वेगळेपणामुळे विशेष मनोवेधक ठरली. ‘शांत सागरी कशास उठविलीस वादळे’ हे गीत याचे उत्कृष्ट प्रातिनिधिक उदाहरण होय.

त्यांचा पहिला कवितासंग्रह काव्यसंजीवनी. त्यानंतर राका, संसार, छाया, चित्रा, चंद्रफूल, मी दिवाणी, आत्मीय, भावपुष्प, परिमला असे कविता आणि गीतसंग्रह प्रकाशित झाले. बालमनाची संवेदनशीलता त्यांच्या कवितेतून दिसत असे. त्यांचे खेळकर, निरागस भावविश्व त्यातून साकारले गेले होते. त्यातील अनेक गीते आजही आठवणीत आहेत.

संजीवनी मराठे यांचे बालपण, जीवनचरित्र, साहित्यिक व्यक्तिमत्व, कौटुंबिक आयुष्य, गद्य, अनुवादित साहित्य व संपादन, गीतरचना, बालकविता, काव्यलेखन, साहित्य यांची माहिती या पुस्तकात देण्याचा प्रयत्न शोभा नाखरे यांनी केला आहे. नव्या पिढीला तसेच साहित्यिक क्षेत्रासाठी ही एक पर्वणी आहे.

Continue reading

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...

‘नीट’ परीक्षेत ‘फिजिक्स’ने केले विद्यार्थ्यांना हैराण!

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात आलेली 'नीट-युजी २०२६' ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. यंदा साधारण २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदाचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कठीण आणि वेळखाऊ होता. विषयनिहाय...

‘तांदळाची कूटनीती’ वापरत भारताची चीन-अमेरिकेला टक्कर

जागतिक स्तरावर ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रासाठी अत्यावश्यक ठरत असलेल्या “क्रिटिकल मिनरल्स”च्या शर्यतीत भारताने आता आफ्रिकेकडे धोरणात्मक पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत केवळ खनिजांसाठी गुंतवणूक करत नाही, तर “तांदळाची कूटनीती” (राईस डिप्लोमसी) वापरत आफ्रिकन देशांशी संबंध...
Skip to content