Homeकल्चर +शोभा नाखरे यांची...

शोभा नाखरे यांची संजीवनी मराठे यांच्या साहित्यिक विश्वाला आदरांजली!

संजीवनी मराठे यांच्या कविता आणि गीते यांनी साहित्यक्षेत्रावर अधिराज्य केले. कवयित्री संजीवनी या नावाने काव्यलेखन करणाऱ्या संजीवनी मराठे या गीतरचना आणि काव्यगायन यासाठी मराठी साहित्य विश्वात ओळखल्या जातात. त्यांच्या साहित्यिक विश्वाचा आढावा घेणारे पुस्तक संजीवनी मराठे – व्यक्तित्व आणि कर्तृत्व या शीर्षकात प्रसिद्ध निवेदिका आणि साहित्यिक शोभा नाखरे यांनी लिहिले असून नवचैतन्य प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केले आहे.

काळाच्या पुढील विचार मनीमानसी रुजवत, काहीशा बंडखोर भूमिका घेत, आपल्या प्रेमाची रुजवात करून सूरशब्द पेरत, मनाच्या कलासक्त गाभाऱ्यात चिरंतन जपून अनेकांना संस्कारक्षम विचारांना मार्ग दाखविणाऱ्या संजीवनी मराठे यांना वाहिलेली ही आदरांजली असल्याचे लेखिकेने म्हटले आहे.

१९३२ साली कोल्हापूर येथील साहित्यसंमेलनातून त्यांचा काव्यक्षेत्रात प्रवेश झाला. त्यांच्यावर भा. रा. तांबे तसेच रवींद्रनाथ टागोरांच्या काव्याची मोहिनीही त्यांत्यावर होती. तांबे यांची जीवनसृष्टी, सौंदर्यशक्ती, तसेच शब्दकळा, आविष्कराचे वळण यांचा संजीवनींच्या कवितेवरील संस्कार स्पष्ट आहे. मनोरमा रानडे यांच्या काव्यातून आधुनिक सुशिक्षित, सुसंस्कृत स्त्रीमनाचा विशेषत: तिच्या प्रणयभावनेचा, जो एक सहजमोकळा आविष्कार घडण्यास प्रारंभ झाला होता, त्याची परंपराही संजीवनींच्या कवितेत पृथगात्य स्वरूपात प्रवाहित झालेली दिसते. प्रणयानुभवातील तरल स्पंदने, त्याची स्वप्‍निलता, अलौकिकता व्यक्त करणारी त्यांची कविता तिच्या अस्सलपणामुळे व वेगळेपणामुळे विशेष मनोवेधक ठरली. ‘शांत सागरी कशास उठविलीस वादळे’ हे गीत याचे उत्कृष्ट प्रातिनिधिक उदाहरण होय.

त्यांचा पहिला कवितासंग्रह काव्यसंजीवनी. त्यानंतर राका, संसार, छाया, चित्रा, चंद्रफूल, मी दिवाणी, आत्मीय, भावपुष्प, परिमला असे कविता आणि गीतसंग्रह प्रकाशित झाले. बालमनाची संवेदनशीलता त्यांच्या कवितेतून दिसत असे. त्यांचे खेळकर, निरागस भावविश्व त्यातून साकारले गेले होते. त्यातील अनेक गीते आजही आठवणीत आहेत.

संजीवनी मराठे यांचे बालपण, जीवनचरित्र, साहित्यिक व्यक्तिमत्व, कौटुंबिक आयुष्य, गद्य, अनुवादित साहित्य व संपादन, गीतरचना, बालकविता, काव्यलेखन, साहित्य यांची माहिती या पुस्तकात देण्याचा प्रयत्न शोभा नाखरे यांनी केला आहे. नव्या पिढीला तसेच साहित्यिक क्षेत्रासाठी ही एक पर्वणी आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content