Homeकल्चर +शोभा नाखरे यांची...

शोभा नाखरे यांची संजीवनी मराठे यांच्या साहित्यिक विश्वाला आदरांजली!

संजीवनी मराठे यांच्या कविता आणि गीते यांनी साहित्यक्षेत्रावर अधिराज्य केले. कवयित्री संजीवनी या नावाने काव्यलेखन करणाऱ्या संजीवनी मराठे या गीतरचना आणि काव्यगायन यासाठी मराठी साहित्य विश्वात ओळखल्या जातात. त्यांच्या साहित्यिक विश्वाचा आढावा घेणारे पुस्तक संजीवनी मराठे – व्यक्तित्व आणि कर्तृत्व या शीर्षकात प्रसिद्ध निवेदिका आणि साहित्यिक शोभा नाखरे यांनी लिहिले असून नवचैतन्य प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केले आहे.

काळाच्या पुढील विचार मनीमानसी रुजवत, काहीशा बंडखोर भूमिका घेत, आपल्या प्रेमाची रुजवात करून सूरशब्द पेरत, मनाच्या कलासक्त गाभाऱ्यात चिरंतन जपून अनेकांना संस्कारक्षम विचारांना मार्ग दाखविणाऱ्या संजीवनी मराठे यांना वाहिलेली ही आदरांजली असल्याचे लेखिकेने म्हटले आहे.

१९३२ साली कोल्हापूर येथील साहित्यसंमेलनातून त्यांचा काव्यक्षेत्रात प्रवेश झाला. त्यांच्यावर भा. रा. तांबे तसेच रवींद्रनाथ टागोरांच्या काव्याची मोहिनीही त्यांत्यावर होती. तांबे यांची जीवनसृष्टी, सौंदर्यशक्ती, तसेच शब्दकळा, आविष्कराचे वळण यांचा संजीवनींच्या कवितेवरील संस्कार स्पष्ट आहे. मनोरमा रानडे यांच्या काव्यातून आधुनिक सुशिक्षित, सुसंस्कृत स्त्रीमनाचा विशेषत: तिच्या प्रणयभावनेचा, जो एक सहजमोकळा आविष्कार घडण्यास प्रारंभ झाला होता, त्याची परंपराही संजीवनींच्या कवितेत पृथगात्य स्वरूपात प्रवाहित झालेली दिसते. प्रणयानुभवातील तरल स्पंदने, त्याची स्वप्‍निलता, अलौकिकता व्यक्त करणारी त्यांची कविता तिच्या अस्सलपणामुळे व वेगळेपणामुळे विशेष मनोवेधक ठरली. ‘शांत सागरी कशास उठविलीस वादळे’ हे गीत याचे उत्कृष्ट प्रातिनिधिक उदाहरण होय.

त्यांचा पहिला कवितासंग्रह काव्यसंजीवनी. त्यानंतर राका, संसार, छाया, चित्रा, चंद्रफूल, मी दिवाणी, आत्मीय, भावपुष्प, परिमला असे कविता आणि गीतसंग्रह प्रकाशित झाले. बालमनाची संवेदनशीलता त्यांच्या कवितेतून दिसत असे. त्यांचे खेळकर, निरागस भावविश्व त्यातून साकारले गेले होते. त्यातील अनेक गीते आजही आठवणीत आहेत.

संजीवनी मराठे यांचे बालपण, जीवनचरित्र, साहित्यिक व्यक्तिमत्व, कौटुंबिक आयुष्य, गद्य, अनुवादित साहित्य व संपादन, गीतरचना, बालकविता, काव्यलेखन, साहित्य यांची माहिती या पुस्तकात देण्याचा प्रयत्न शोभा नाखरे यांनी केला आहे. नव्या पिढीला तसेच साहित्यिक क्षेत्रासाठी ही एक पर्वणी आहे.

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content