Homeचिट चॅटरक्षाबंधनाच्या भेटवस्तूंसाठी ‘ट्राइब्ज...

रक्षाबंधनाच्या भेटवस्तूंसाठी ‘ट्राइब्ज इंडिया’!

ट्राइब्ज इंडिया, हे तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला द्यायच्या भेटवस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे आदर्श ठिकाण आहे. ट्राइब्ज इंडिया, येथे आदिवासी उत्पादनांच्या आकर्षक आणि उत्कृष्ट हस्तकलेच्या तसेच धातूंच्या वस्तू, वस्त्रे आणि सेंद्रिय हर्बल उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

यंदा ट्राइब्ज इंडिया कॅटलॉगमध्ये खास राखी विभाग तयार केला आहे. स्नेह आणि आधाराचे प्रतीक असणाऱ्या रक्षाबंधन उत्सवाची तयारी करताना आपण भेटवस्तू निवडण्यासाठी आपल्या जवळच्या ट्राइब्ज इंडिया दुकानाला किंवा संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

त्यात देशभरातील आदिवासींनी हाताने बनविलेल्या राख्या, पूजेसाठी वापरले जाणारे धातूचे डबे आणि तोरण आदी सजावटीच्या वस्तू मिळू शकतात. याव्यतिरिक्त, ट्राइब्ज इंडियामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी रंगीबेरंगी कुर्ते, सलवार, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्र शैलीतील जॅकेट्स तसेच माहेश्वरी, चंदेरी, बाग, कंठा, भंडारा, तुसार, संभालपुरी आणि इकत इत्यादी प्रकारातील साड्या, कपडे उपलब्ध आहेत.

आदिवासींच्या विविध वस्तू आणि उत्पादनांच्या विकास आणि विपणनाद्वारे आदिवासींचे जीवनमान उंचावून त्यांचे सबलीकरण करण्याच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने ट्रायफेड ट्राइब्ज इंडिया आपल्या देशभरातील दालनांमधील विक्रीसाठी ठेवलेल्या विविधांगी व आकर्षक श्रेणीतील उत्पादनांची व्याप्ती वाढवत आहे. देशातील 137 ट्राइब्ज इंडिया दालने आणि ई-कॉमर्स मंच (www.tribesindia.com) इथे ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करणारी उत्पादने उपलब्ध करून देतात.

कठपुतळीसारख्या मुलांच्या खेळण्यांपासून ते पारंपरिक विणकामापर्यंत जसे की डोंग्रिया शाल आणि बोडो विणकाम असलेली उच्च प्रतीची आणि विविधांगी वस्त्रप्रावरणे आणि रेशमी वस्त्रे; धातू शिल्प ते बांबू उत्पादने; अशी कोणतीही आणि प्रत्येक प्रकारची भेटवस्तू इथे उपलब्ध आहे. सर्व भेटवस्तूसाठी सेंद्रिय, पुनर्चक्रीकरणीय, शाश्वत वेष्टन साहित्य वापरले जाते, ज्याची रचना सुप्रसिद्ध डिझायनर रीना ढाका यांनी केली आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content