Homeचिट चॅटविजय मडव यांना...

विजय मडव यांना यंदाचा शारदा पुरस्कार

प्रख्यात साहित्यिक विजय मडव यांना यंदाचा शारदा पुरस्कार देण्यात येणार असून जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार मागाठाणे मित्र मंडळाचे खंदे कार्यकर्ते दिलीप चव्हाण आणि वसंत सावंत यांना देण्यात येणार आहे.

मुंबई उपनगरातील रसिक श्रोत्यांना अविरत बौद्धिक मेजवानी उपलब्ध करून देणारे ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी यंदाच्या ४२व्या वर्षीच्या जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील वसंत व्याख्यानमालेत सालाबादप्रमाणे देण्यात येणारे शारदा पुरस्कार आणि जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार यांच्या नावांची घोषणा केली असून या वर्षापासून प्रेरणा पुरस्कारही देण्याचेही जाहीर केले.

यंदाचा पहिलावहिला प्रेरणा पुरस्कार विजय घरटकर यांना देण्यात येणार आहे. वायंगणकर साई स्पोर्ट्सच्या मल्लखांबपटू हर्षिता वायंगणकर हिने राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठ स्पर्धेत अभिमानास्पद यश संपादन केले असून या तिच्या यशाबद्दल तिलाही सन्मानित करण्यात येणार आहे. रविवारी, २६ मे रोजी प्रमुख अतिथींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक विजय वैद्य आणि  प्रा. नयना रेगे यांनी दिली.

Continue reading

राष्ट्रीय महामार्गांवरून आता ओव्हरलोड वाहनेही धावणार सुसाट!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवरील अतिभारित (ओव्हरलोडेड) वाहनांसाठी अतिरिक्त शुल्क आकारणारी कायदेशीर सुधारणा अधिसूचित केली ाहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरून अतिरिक्त शुल्क देऊन नियमापेक्षा जास्त माल घेऊन जाण्यास मालवाहतूकदारांना सहज शक्य होणार आहे. परिणामी राष्ट्रीय महामार्गांवर आता...

‘अच्चप्पास् अल्बम’ येत्या 24 एप्रिलला होणार प्रदर्शित

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ म्हणजेच एनएफडीसी आपला मल्याळम चित्रपट ‘अच्चप्पास् अल्बम’ (आजीचा अल्बम) येत्या 24 एप्रिलला देशभर प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात कौटुंबिक कल्पनारम्य कथा, विनोद आणि भावनांच्या कल्लोळाचा एक अनोखा मेळ...

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...
Skip to content